शरद पवार, उद्धव ठाकरे हेच आव्हाडांचे बोलविते धनी

  109

जितेंद्र आव्हाडांवर कारवाईचे आदेशही निघाल्याची संजय शिरसाटांची माहिती


छत्रपती संभाजीनगर : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) बोलत नाहीत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत नाहीत. त्यांना जातीय दंगली घडवायचा आहेत की काय? असा संशय येतो. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची गरज आहे. गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्याला आहारी जाऊ नका. आडवे येणाऱ्या मांजरांना जनता धडा शिकवेल. श्रीराम मांसाहार करायचे याचे दाखले देणे सुरु आहे. पण यासाठी हीच वेळ का? यांच्यावर कारवाई निश्चित होईल, तसे आदेशही दिले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत, त्यांच्याकडे आम्ही देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले.



राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.


“राम मंदिर उद्घाटनानिमित्त काही लोक उगाच भावना भडकवत आहेत. ती वक्तव्य चीड आणणारी आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. हे का करत आहेत आणि तेही राष्ट्रवादीच्या मेळाव्यात. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये यांना समाजात आपापसांत तेढ निर्माण करायची आहे. तसेच याचा फायदा घ्यायचा आहे," असेही शिरसाट म्हणाले.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही