छत्रपती संभाजीनगर : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) बोलत नाहीत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत नाहीत. त्यांना जातीय दंगली घडवायचा आहेत की काय? असा संशय येतो. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची गरज आहे. गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्याला आहारी जाऊ नका. आडवे येणाऱ्या मांजरांना जनता धडा शिकवेल. श्रीराम मांसाहार करायचे याचे दाखले देणे सुरु आहे. पण यासाठी हीच वेळ का? यांच्यावर कारवाई निश्चित होईल, तसे आदेशही दिले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत, त्यांच्याकडे आम्ही देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले.
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
“राम मंदिर उद्घाटनानिमित्त काही लोक उगाच भावना भडकवत आहेत. ती वक्तव्य चीड आणणारी आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. हे का करत आहेत आणि तेही राष्ट्रवादीच्या मेळाव्यात. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये यांना समाजात आपापसांत तेढ निर्माण करायची आहे. तसेच याचा फायदा घ्यायचा आहे,” असेही शिरसाट म्हणाले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…