Nitesh Rane : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांना अटक करा

  136

आमदार नितेश राणे यांची मागणी

मुंबई : काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत हे वारंवार न्यायालयाचा अवमान करत आहेत. ते न्यायालयाचा कोणताही निर्णय मानत नाहीत. न्यायालयाचा वारंवार अपमान करत राहायचे, याबाबत मी स्वतः न्यायालयाला विनंती करतो की, राऊतांवर सुमोटो कारवाई करून लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.

पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या समुहामुळे देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. मेक इन इंडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. या संकल्पपूर्तीला आधार देणारे अदानी सारखे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. त्या महत्त्वाच्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने आणि पर्यायाने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. न्यायालयाकडून तो काल हाणून पाडण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.

न्यायालयाच्या निर्णयाची मिर्ची लागल्याने संजय राऊत यांनी अदानी समूहाबद्दल गरळ ओकली आहे. तसेच आजचा सामनाचा अग्रलेख ही त्यावर आहे. एका बाजूला मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शरद पवार यांचा चेला आहे, असे संजय राऊत म्हणतात. मग त्यांनी अदानी समूहाबद्दल शरद पवार यांचे काय मत आहे हे समजून घ्यावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही