Nitesh Rane : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांना अटक करा

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत हे वारंवार न्यायालयाचा अवमान करत आहेत. ते न्यायालयाचा कोणताही निर्णय मानत नाहीत. न्यायालयाचा वारंवार अपमान करत राहायचे, याबाबत मी स्वतः न्यायालयाला विनंती करतो की, राऊतांवर सुमोटो कारवाई करून लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.


पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या समुहामुळे देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. मेक इन इंडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. या संकल्पपूर्तीला आधार देणारे अदानी सारखे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. त्या महत्त्वाच्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने आणि पर्यायाने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. न्यायालयाकडून तो काल हाणून पाडण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.


न्यायालयाच्या निर्णयाची मिर्ची लागल्याने संजय राऊत यांनी अदानी समूहाबद्दल गरळ ओकली आहे. तसेच आजचा सामनाचा अग्रलेख ही त्यावर आहे. एका बाजूला मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शरद पवार यांचा चेला आहे, असे संजय राऊत म्हणतात. मग त्यांनी अदानी समूहाबद्दल शरद पवार यांचे काय मत आहे हे समजून घ्यावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास