Nitesh Rane : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांना अटक करा

  131

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत हे वारंवार न्यायालयाचा अवमान करत आहेत. ते न्यायालयाचा कोणताही निर्णय मानत नाहीत. न्यायालयाचा वारंवार अपमान करत राहायचे, याबाबत मी स्वतः न्यायालयाला विनंती करतो की, राऊतांवर सुमोटो कारवाई करून लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.


पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या समुहामुळे देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. मेक इन इंडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. या संकल्पपूर्तीला आधार देणारे अदानी सारखे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. त्या महत्त्वाच्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने आणि पर्यायाने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. न्यायालयाकडून तो काल हाणून पाडण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.


न्यायालयाच्या निर्णयाची मिर्ची लागल्याने संजय राऊत यांनी अदानी समूहाबद्दल गरळ ओकली आहे. तसेच आजचा सामनाचा अग्रलेख ही त्यावर आहे. एका बाजूला मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शरद पवार यांचा चेला आहे, असे संजय राऊत म्हणतात. मग त्यांनी अदानी समूहाबद्दल शरद पवार यांचे काय मत आहे हे समजून घ्यावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका