नवी दिल्ली : एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीने जारी केलेला हजर राहण्याचा समन्स धुडकावून लावला आहे. बुधवारी त्यांना ईडीसमोर हजर रहायचे होते, परंतू त्यांनी लिखित उत्तर पाठवत तुमची नोटीसच अवैध असल्याचे म्हटले आहे.
यामुळे आता पुढे काय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस केजरीवाल यांनी केले आहे. यामागे केजरीवाल काही लपवत आहेत की राजकीय फायदा करून घेणार आहेत असा प्रश्न राजकीय धुरीनांना पडला आहे.
आप या प्रकरणी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा देत आहे. यामुळे ईडीचे आता पुढचे पाऊल काय असेल यावरही दिल्लीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. परंतु केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…