Thane Rave Party : ठाण्यातील रेव्ह पार्टी आयोजित करणारे तरुण केवळ १९ आणि २० वर्षांचे

कुठून आले चरस, गांजासारखे अमली पदार्थ?


ठाणे : भारतात वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की सर्व अधिकार मिळतात. पण काही अनुचित गोष्टी २० वर्षांच्या तरुणांकडून घडणेदेखील धक्कादायक वाटते. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यात नववर्षाच्या (New year) निमित्ताने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीतून (Rave party) समोर आला आहे. काल रात्री पोलिसांनी धाड कारवाई करत या रेव्ह पार्टीतील मद्यधुंद असलेल्या १०० जणांवर कारवाई केली. त्यांच्या कसून केलेल्या चौकशीत या रेव्ह पार्टीचं आयोजन करणारे तरुण केवळ १९ आणि २० वर्षीय असल्याचं समजलं आहे.


ठाण्यातील घोडबंदर परिसरातील गायमूख कासारवडवली या भागात रात्री करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड कारवाई केली. नुकताच प्रौढ झालेला वर्ग या पार्टीत सामील होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ तरुणींसह ९५ तरुणांवर कारवाई केली आहे.


प्राथमिक चौकशीत डोंबिवलीतील रहिवासी २३ वर्षीय तेजस कुणाल आणि ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या १९ वर्षीय सुजल महाजन यांच्यावर पार्टी आयोजित करण्याचा आरोप ठेवला गेला आहे. त्यांनी एक हजार रुपये प्रवेश शुल्क घेऊन सदर पार्टी आयोजित केली होती. दोन्ही आरोपींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोन पार्टी सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी पार्टीचा पत्ता आणि माहिती पोस्ट केली होती.


पोलिसांनी सांगितले की, १९ ते २० वर्षांमधील तरूण मुले पार्टीत सामील होते. त्यांनी अमली पदार्थ आणि मद्याचे सेवन केले होते. तसेच मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा सुरू होता. पोलिसांनी २०० ग्रॅम गांजा, ७० ग्रॅम चरस, ०.४० ग्रॅम एलएसडी आणि एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत. ताब्यात घेतलेले तरूण ठाणे, मीरा रोड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील रहिवासी आहेत.


दरम्यान, या पार्टीत अमली पदार्थ कुणी पुरविले, याची माहिती पोलिस गोळा करत आहेत. भारतीय दंड संहिता आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या १०० जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव