मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने(ambati raydu) आंध्र प्रदेशच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डीच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्ती घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर गुरूवारी अधिकृतपणे पक्षात सामील झाला आहे.
अंबाती रायडूने श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. रायडूने अशा वेळेस पक्षात प्रवेश केला जेव्हा सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. अशातच सवाल केला जात आहे की पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का?
गुंटूर जिल्ह्याच्या प्रत्येक विभागाचा केला दौरा
रायडूने आपला शेवटचा क्रिकेट सामना २९ मेला इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. राजकारणात येण्याआधी त्याने आपला मुद्दा समजण्यासाठी आपला मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा दौरा केला आणि लोकांची भेट घेतली.
राजकारणात येण्याचे दिले होते संकेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने बुधवारी मीडियाला सांगितले होते, मी लोकांची सेवा करण्यासाठी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात येण्याआधी मी लोकांची नस ओळखण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासाठी खेळले ५५ वनडे सामने
रायडूने भारताकडून ५५ वनडे सामने खेळते. या दरम्यान त्याने ४७हून अधिक सरासरीने १६९४ धावा केल्या. वनडेत रायडूने ३ शतके आणि १० अर्धशतके ठोकली. सोबतच त्याच्या नावावर ३ विकेटही आहेत. तर ६ टी-२० सामन्यात रायडूने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५०च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायडूने ६१५१ धावा केल्या तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या.