मुंबई : श्री राम मंदिर उद्धाटन (Ram Mandir) सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.
श्री राम मंदिराला उद्धव ठाकरेंचे काहीही योगदान नाही. आणि कोणी उद्धव ठाकरेंचे १९९३च्या दंगलीत काही योगदान असल्याचे सांगत असतील तर त्यांनी त्या दंगलीतला उद्धव ठाकरेंचा एक पुरावा, एक फोटो आणून द्यावा असे ओपन चॅलेंज यावेळी नितेश राणे यांनी त्यांचा कामगार संजय राजाराम राऊतांना दिले आहे.
नितेश राणे म्हणाले की, ज्याच्यावर एक साधा एफआयआर नाही, एक एनसी नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराच्या कार्यक्रमाला का बोलवायचे? हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विश्व हिंदू परिषदेचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे योगदानाबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण विषय असा आहे की, ज्या उद्धव ठाकरेंचा राम मंदिर आणि अयोध्येशी काडीमात्र संबंध नाही, त्याला मंदिराच्या कार्यक्रमाला फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर म्हणून का बोलवायचे? असाही सवाल त्यांनी केला.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…