राम मंदिर आणि ९३च्या दंगलीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय?

  235

एक तरी फोटो दाखवा, भाजप आमदार नितेश राणे यांचे ओपन चॅलेंज


मुंबई : श्री राम मंदिर उद्धाटन (Ram Mandir) सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.


श्री राम मंदिराला उद्धव ठाकरेंचे काहीही योगदान नाही. आणि कोणी उद्धव ठाकरेंचे १९९३च्या दंगलीत काही योगदान असल्याचे सांगत असतील तर त्यांनी त्या दंगलीतला उद्धव ठाकरेंचा एक पुरावा, एक फोटो आणून द्यावा असे ओपन चॅलेंज यावेळी नितेश राणे यांनी त्यांचा कामगार संजय राजाराम राऊतांना दिले आहे.


नितेश राणे म्हणाले की, ज्याच्यावर एक साधा एफआयआर नाही, एक एनसी नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराच्या कार्यक्रमाला का बोलवायचे? हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विश्व हिंदू परिषदेचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे योगदानाबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण विषय असा आहे की, ज्या उद्धव ठाकरेंचा राम मंदिर आणि अयोध्येशी काडीमात्र संबंध नाही, त्याला मंदिराच्या कार्यक्रमाला फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर म्हणून का बोलवायचे? असाही सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता