बृजभूषण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगाट परत करणार खेलरत्न, अर्जुन अवॉर्ड, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली: भारताचे दिग्गद कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.



काय लिहिले विनेश फोगाटने?


विनेश फोगाटने लिहिले, माननीय पंतप्रधान साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला आहे. तुम्ही तर देशाचे प्रमुख आहात तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. मी तुमच्या घरातील मुलगी विनेश फोगाट आहे आणि गेल्या एक वर्षांपासून ज्या हालमध्ये आहे ते सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.


फोगाटने पुढे लिहिले की मला आठवत आहे की २०१६मध्ये जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकून आली होती तेव्हा सरकारने त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओचा ब्राँड अॅम्बेसिडेर बनवले होते. याची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देशातील महिला खुश झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले होते. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला २०१६ पुन्हा पुन्हा आठवत आहे.


 


गुरूवारी डब्लूएफआयचे अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंहने विजय मिळवला होता. याच्या विरोधात शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.


रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरूवारी टेबलावर आपले शूज ठेवत निवृत्तीची घोषणा करत भावूकपणे म्हटले होते की आम्ही मनापासून लढाई लढली, मात्र बृजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीला WFIचे अध्यक्षपद मिळाले आहे मी कुस्ती सोडत आहे.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत