बृजभूषण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगाट परत करणार खेलरत्न, अर्जुन अवॉर्ड, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

  86

नवी दिल्ली: भारताचे दिग्गद कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.



काय लिहिले विनेश फोगाटने?


विनेश फोगाटने लिहिले, माननीय पंतप्रधान साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला आहे. तुम्ही तर देशाचे प्रमुख आहात तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. मी तुमच्या घरातील मुलगी विनेश फोगाट आहे आणि गेल्या एक वर्षांपासून ज्या हालमध्ये आहे ते सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.


फोगाटने पुढे लिहिले की मला आठवत आहे की २०१६मध्ये जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकून आली होती तेव्हा सरकारने त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओचा ब्राँड अॅम्बेसिडेर बनवले होते. याची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देशातील महिला खुश झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले होते. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला २०१६ पुन्हा पुन्हा आठवत आहे.


 


गुरूवारी डब्लूएफआयचे अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंहने विजय मिळवला होता. याच्या विरोधात शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.


रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरूवारी टेबलावर आपले शूज ठेवत निवृत्तीची घोषणा करत भावूकपणे म्हटले होते की आम्ही मनापासून लढाई लढली, मात्र बृजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीला WFIचे अध्यक्षपद मिळाले आहे मी कुस्ती सोडत आहे.

Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची