बृजभूषण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगाट परत करणार खेलरत्न, अर्जुन अवॉर्ड, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

  84

नवी दिल्ली: भारताचे दिग्गद कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.



काय लिहिले विनेश फोगाटने?


विनेश फोगाटने लिहिले, माननीय पंतप्रधान साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला आहे. तुम्ही तर देशाचे प्रमुख आहात तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. मी तुमच्या घरातील मुलगी विनेश फोगाट आहे आणि गेल्या एक वर्षांपासून ज्या हालमध्ये आहे ते सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.


फोगाटने पुढे लिहिले की मला आठवत आहे की २०१६मध्ये जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकून आली होती तेव्हा सरकारने त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओचा ब्राँड अॅम्बेसिडेर बनवले होते. याची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देशातील महिला खुश झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले होते. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला २०१६ पुन्हा पुन्हा आठवत आहे.


 


गुरूवारी डब्लूएफआयचे अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंहने विजय मिळवला होता. याच्या विरोधात शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.


रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरूवारी टेबलावर आपले शूज ठेवत निवृत्तीची घोषणा करत भावूकपणे म्हटले होते की आम्ही मनापासून लढाई लढली, मात्र बृजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीला WFIचे अध्यक्षपद मिळाले आहे मी कुस्ती सोडत आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार