बृजभूषण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगाट परत करणार खेलरत्न, अर्जुन अवॉर्ड, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली: भारताचे दिग्गद कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.



काय लिहिले विनेश फोगाटने?


विनेश फोगाटने लिहिले, माननीय पंतप्रधान साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला आहे. तुम्ही तर देशाचे प्रमुख आहात तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. मी तुमच्या घरातील मुलगी विनेश फोगाट आहे आणि गेल्या एक वर्षांपासून ज्या हालमध्ये आहे ते सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.


फोगाटने पुढे लिहिले की मला आठवत आहे की २०१६मध्ये जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकून आली होती तेव्हा सरकारने त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओचा ब्राँड अॅम्बेसिडेर बनवले होते. याची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देशातील महिला खुश झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले होते. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला २०१६ पुन्हा पुन्हा आठवत आहे.


 


गुरूवारी डब्लूएफआयचे अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंहने विजय मिळवला होता. याच्या विरोधात शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.


रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरूवारी टेबलावर आपले शूज ठेवत निवृत्तीची घोषणा करत भावूकपणे म्हटले होते की आम्ही मनापासून लढाई लढली, मात्र बृजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीला WFIचे अध्यक्षपद मिळाले आहे मी कुस्ती सोडत आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे