Water Shortage : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक

मुंबई : राज्यात यावर्षी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०.२५ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट (Water Shortage) झाली आहे. सध्या राज्यातील तीन हजार धरणांतील पाणीसाठा ७६.२० टक्के इतकाच शिल्लक आहे. यामुळे उन्हाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.


पुणे शहरातही पाण्याची परिस्थिती भविष्यात गंभीर होणार असून मोठा प्रश्न उद्भवणार आहे. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी या संदर्भात पत्र लिहून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. राज्यात २ हजार ९९४ लहान-मोठी धरणे असून त्यातील पाणीसाठा दररोज कमी होत आहे.



मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा


भातसा


गेल्या वर्षी - 82.81


या वर्षी - 77.80


मोडक सागर


गेल्या वर्षी 76.23


या वर्षी 68.05


तानसा


गेल्या वर्षी 84.99


या वर्षी 79.79


मध्य वैतरणा


गेल्या वर्षी 49.57


या वर्षी 47.37



राज्यातील धरणांमधील पाणीसाठा


नागपूर


गेल्या वर्षी 81.01


या वर्षी 70.17


अमरावती


गेल्या वर्षी 86.65


या वर्षी 72.36


संभाजीनगर


गेल्या वर्षी 90.73


या वर्षी 43.42


नाशिक


गेल्या वर्षी 97.21


या वर्षी 73.79


पुणे


गेल्या वर्षी 87.11


या वर्षी 81.17

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या