पालघर जिल्हा आदिवासीबहुल भाग म्हणून सर्व परिचित आहे. मूलभूत सुविधांचाही अभाव असलेल्या या भागाचा विकास व्हावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातून २०१४ साली पालघर या भागाचे स्वतंत्र जिल्हा म्हणून विभाजन झाले. मात्र मुख्य प्रवाहापासून मूलभूत सुविधांपासून अनेक वर्ष इथला आदिवासी बांधव आजही वंचित आहे. किमान जन्मताच दररोज ३ बालके कुपोषणाने मृत्युमुखी पडतात, तर शेकडो लोकांना उपचारासाठी पैसे नसल्याने व आपल्या जिल्ह्यात रुग्णालय नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. जिथे आरोग्याची ही तऱ्हा तिथे शिक्षणाचाही काय अवस्था असेल? याची कल्पना कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही येईल. म्हणूनच या परिस्थितीत परिवर्तनाचा ध्यास घेऊन जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांनाही अत्याधुनिक शिक्षणाचा परिस्पर्श होण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे २०१५ साली आपल्या आईच्या नावाने सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमावर आधारित शाळा सुरू केली. त्यामध्ये इयत्ता नर्सरी ते इयत्ता १२ वीपर्यंत सी.बी.एस.सी. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये सुद्धा शिक्षण दिले जाते. आपल्या शाळेत एकूण १२०८ त्यामध्ये एकूण मुले ६१६ आणि ५९२ मुली शिक्षण घेत आहेत.
एकीकडे अशा प्रकारच्या इतर शाळांमध्ये शिक्षणासाठी भली मोठी फी आकारली जाते. मात्र या शाळेत सर्व वर्गातील तसेच सर्व जाती-जमातीतील मुलांना मोफत सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. मोफत वह्या आणि शाळेचा गणवेश हे देखील अगदी दिले जाते. विद्यार्थांना एक पेन्सिलही स्वत:च्या पैशाने विकत घ्यावी लागत नाही. येथील हा भाग दुर्गम आदिवासीबहुल असल्याने आदिवासी भागात सुरुवातीला मुलांना शिकवताना भाषेची समस्या निर्माण झाली. त्यानंतर सी.बी.एस.ई अभ्सासक्रमानुसार शिकवताना त्यांना दिला जाणारा अभ्यास हा घरी त्यांचे पालक करून घेत नाहीत म्हणून मुलांकडे अतिक्षय प्राथमिक टप्प्यातून शिक्षणाची सुरुवात केली. डीजिटल माध्यमांचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळ देण्याचे काम केले. पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सी.बी.एस.ई च्या शिक्षणाबद्दल महत्त्व पटवून देण्यात आले. कारण कुठल्याही परिस्थितीत या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे स्वप्न होते.
“इथला प्रत्येक माणूस सक्षम झाला पाहिजे हा संस्थेने पेरलेला विचार आता रुजलाय आणि अधिक बहारदारपणे फुलतोय देखील. उद्याची येणारी सक्षम पिढी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मातीतून घडत आहे, याचे अपार समाधान आहे.
– निलेश भगवान सांबरे (संस्थापक – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था)
वाचनालय
सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुसज्ज व विविध पुस्तकांनी भरलेले वाचनालय आहे. तसेच UPSC / MPSC ॲॅकॅडमीचे मोठे वाचनालय आहे. यामध्ये
येथील विद्यार्थी पुढील ध्येयाची पूर्तता करण्यासाठी वाटचाल करीत आहेत.
केवळ शिक्षण नाही, तर सक्षमही केले जाते
आजच्या युगातील स्पर्धा पाहता आपल्या शाळेत इयत्ता ९ वीपासून इयत्ता १२ पर्यंत NEET आणि IIT-JEE या स्पर्धापरीक्षेकरिता वेगळे आणि विशेष विषय तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षांच्या विषयांची वैयक्तिक तयारी करून घेतली जाते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास व परत जाण्यास होणारा त्रास लक्षात घेता शाळेच्या आवारामध्ये मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह बनवण्यात आले आहे. शाळेत मुलांना / विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी सर्व सुविधापूर्ण शाळेची बस तसेच व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासाठी भव्य असे क्रीडांगण शाळेच्या आवारात देण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्तीची जोपासना करण्यात येईल. शाळेत सुसज्ज कॉम्प्युटर (संगणक कक्ष) लॅब, संगीत कक्ष, तसेच स्वतंत्र कला कक्ष देण्यात आला आहे.
शाळेतील विविध उपक्रम
पालकांचा अनुभव :-
विद्यार्थ्यांच्या पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. “माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा’ म्हणून सी. बी. एस. ई शिक्षणाकडे त्यांनी बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केले आहे. “अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा संस्थेचा मूळ उद्देश सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. पालक सभेसाठी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन पालक करतात.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…