Arbaaz Khan: वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतोय अरबाज खान

मुंबई: सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान(arbaz khan) वयाच्या ५६व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो गेल्या काही काळापासून मेकअप आर्टिस्ट शौरा खानला डेट करत होता. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज म्हणजेच २४ डिसेंबरला अरबाज खान आणि शौरा खान लग्न करतील. यासाठी संपूर्ण खान कुटुंबियाची तयारी झाली आहे.



लग्नस्थळी पोहोचले खान कुटुंबीय


अरबाज खानच्या लग्नाचे सर्व विधी बहीण अर्पिता खान हिच्या घरी होतील. लहान भावाच्या लग्नात सामील होण्यासाठी सलमान खान लग्नस्थळी पोहोचला आहे आणि हळू हळू संपूर्ण खान कुटुंबीय अरबाज आणि शौरा खानच्या लग्नासाठी पोहोचत आहेत. रिपोर्टनुसार शौरा आणि अरबाजच्या लग्नात सामील होण्यासाठी रवीना टंडन, मुलगी राशासह सोहेल खान आपल्या मुलासह, अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि यूलिया वंतूर लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.



अचानक घेतला लग्नाचा निर्णय


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अरबाज खान आणि शौरा खान यांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लवकर करायचे होते. अरबाज आणि शौरा यांची भेट पटना शुक्ला या सिनेमादरम्यान झाली होती. दोघांनी आपले नाते गुप्त ठेवले होते आणि लग्नाबाबतही त्यांनी वाच्यता केली आहे.



जॉर्जिया एंड्रियानीसोबत अरबाजचा ब्रेकअप


शौराआधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. मात्र त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले नाही. काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने अरबाजसोबतच्या ब्रेकअपबाबत भाष्य केले होते. जॉर्जिया एंड्रियानीला डेट करण्याआधी अरबाज आणि मलायका दोघे नवरा-बायको होते. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यानंतर २०१७मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाज यांचा एक मुलगा अरहान खान आहे.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि