Arbaaz Khan: वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतोय अरबाज खान

मुंबई: सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान(arbaz khan) वयाच्या ५६व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो गेल्या काही काळापासून मेकअप आर्टिस्ट शौरा खानला डेट करत होता. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज म्हणजेच २४ डिसेंबरला अरबाज खान आणि शौरा खान लग्न करतील. यासाठी संपूर्ण खान कुटुंबियाची तयारी झाली आहे.



लग्नस्थळी पोहोचले खान कुटुंबीय


अरबाज खानच्या लग्नाचे सर्व विधी बहीण अर्पिता खान हिच्या घरी होतील. लहान भावाच्या लग्नात सामील होण्यासाठी सलमान खान लग्नस्थळी पोहोचला आहे आणि हळू हळू संपूर्ण खान कुटुंबीय अरबाज आणि शौरा खानच्या लग्नासाठी पोहोचत आहेत. रिपोर्टनुसार शौरा आणि अरबाजच्या लग्नात सामील होण्यासाठी रवीना टंडन, मुलगी राशासह सोहेल खान आपल्या मुलासह, अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि यूलिया वंतूर लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.



अचानक घेतला लग्नाचा निर्णय


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अरबाज खान आणि शौरा खान यांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लवकर करायचे होते. अरबाज आणि शौरा यांची भेट पटना शुक्ला या सिनेमादरम्यान झाली होती. दोघांनी आपले नाते गुप्त ठेवले होते आणि लग्नाबाबतही त्यांनी वाच्यता केली आहे.



जॉर्जिया एंड्रियानीसोबत अरबाजचा ब्रेकअप


शौराआधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. मात्र त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले नाही. काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने अरबाजसोबतच्या ब्रेकअपबाबत भाष्य केले होते. जॉर्जिया एंड्रियानीला डेट करण्याआधी अरबाज आणि मलायका दोघे नवरा-बायको होते. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यानंतर २०१७मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाज यांचा एक मुलगा अरहान खान आहे.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि