Pune Water Supply : पुण्यात पाणीटंचाई! पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा आज पाणी पुरवठा बंद

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन


पुणे : सध्या वातावरणात अनेक अनपेक्षित बदल झाल्याने हिवाळ्याच्या मोसमात देखील हवामान वेगळं आहे. दक्षिणेकडील राज्यांत तर मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे राज्यातील पुण्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. पालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.


पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहा टक्के कमी पाणीसाठा आहे. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. त्यामुळे जानेवारी महिना उजाडायच्या आधीच पुणे शहराला पाणी कपातीची समस्या सोसावी लागत आहे. देखभालीच्या कामासाठी चिंचवडमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे कमी पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करा अशा सूचना दिल्या आहेत.


पाणीसाठ्यावरुन येत्या काही दिवसात पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुद्धा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.



पुणे जिल्ह्यातील धरण साखळी पाणीसाठा (टक्केवारी)


खडकवासला: ७७.०७ टक्के


पानशेत: ८८.२७ टक्के


वरसगाव: ८२.०५ टक्के


टेमघर: ३८ टक्के


यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुण्यातील धरणं १०० टक्के देखील भरली नाहीत. त्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचा वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये