पुणे : सध्या वातावरणात अनेक अनपेक्षित बदल झाल्याने हिवाळ्याच्या मोसमात देखील हवामान वेगळं आहे. दक्षिणेकडील राज्यांत तर मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे राज्यातील पुण्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. पालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहा टक्के कमी पाणीसाठा आहे. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. त्यामुळे जानेवारी महिना उजाडायच्या आधीच पुणे शहराला पाणी कपातीची समस्या सोसावी लागत आहे. देखभालीच्या कामासाठी चिंचवडमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे कमी पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करा अशा सूचना दिल्या आहेत.
पाणीसाठ्यावरुन येत्या काही दिवसात पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुद्धा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.
खडकवासला: ७७.०७ टक्के
पानशेत: ८८.२७ टक्के
वरसगाव: ८२.०५ टक्के
टेमघर: ३८ टक्के
यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुण्यातील धरणं १०० टक्के देखील भरली नाहीत. त्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचा वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…