Terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गुरूवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजौरीच्या थानामंडीच्या डेरा की गलीमध्ये २० डिसेंबरच्या रात्रीपासून ऑपरेशन सुरू होते. २१ डिसेंबरच्या दुपारी ३.४५ मिनिटांनी लष्कराच्या दोन गाड्या जेव्हा सैन्याला घेऊन ऑपरेशन एरियामध्ये जात होते तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी याला प्रत्युत्तर दिले.


 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांनी सांगितले, हे वाहन बुफलियाज येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराबंदी तसेच तपास अभियान बुधवारपासून सुरू आहे.



काय म्हटलं लष्कराने?


लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त जवानांना घटनास्थळी पाठवले जात आहे.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला