पाकिस्तानची अफगाणिस्तानला युद्धाची धमकी, पण का?

भारताचा तालिबानला मदतीचा हात


नवी दिल्ली : लाखो अफगाणिस्तानी लोकांना पाकिस्तानने त्यांच्या देशातून हद्दपार केल्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी तालिबानने केली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तालिबान सरकार भारताच्या मदतीने कुनार नदीवर एक मोठे धरण बांधणार आहे. तालिबानच्या या घोषणेनंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांनी तालिबानला थेट युद्धाची धमकी दिली आहे.


कुनार नदी धरण प्रकल्पावर तालिबान आणि भारत यांच्यात अनेक वर्षांपासून वाटाघाटी सुरू होत्या. मात्र त्याला आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी या प्रकारानंतर थेट युद्धाची धमकी दिल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानी नेत्याने भारताला या मुद्द्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिल्याचे बोलले जात आहे. जान अचकझाई म्हणाले की, तालिबानने भारतीय कंपनीच्या सहकार्याने कुनार धरण बांधले तर ते दोन्ही देशांमधील युद्धाच्या सुरुवातीचे पहिले पाऊल मानले जाईल. पाकिस्तानच्या या धमकीवर तालिबानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


खम्मा प्रेसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातून लाखो लोकांना बाहेर काढल्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक लोकांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तालिबान प्रशासनाला कुनार नदीवर धरण बांधण्याची विनंती केली होती. तसेच अनेक अफगाणी लोकांनी थेट तालिबानला आर्थिक मदत देऊ केली होती, जेणेकरून ते कुनार नदीवर धरण बांधू शकतील, असे सांगितले जात होते.


अफगाणिस्तानची कुनार नदी गेली अनेक दशके पाकिस्तानात कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाहत आहे. यापूर्वी अश्रफ घनी सरकारला भारताच्या सहकार्याने यावर धरण बांधायचे होते पण ते शक्य झाले नाही. अफगाणिस्तान कुनार नदीवर धरण बांधण्यात यशस्वी ठरला तर आपले पाणी येणे बंद होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तानला जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धमकी द्यायचे असेल तेव्हा ते आपली पाण्याची वाट अडवेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच धरणाच्या बांधकामाच्या केवळ बातमीनेच पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून पाकिस्तान प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

शिखर परिषदेने परंपरा मोडली जोहान्सबर्ग : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त

एलियन्स पृथ्वीवर येणार, एआय अनियंत्रित होणार, जगात विनाशकारी युद्ध होणार आणि बरंच काही... काय सांगते बाबा वेंगांची भविष्यवाणी

यावर्षाचा उत्तर काळ सुरू झाला असून नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे २०२६ वर्ष कसे असेल?

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग

दुबईच्या एअर शो मध्ये कोसळले भारतीय विमान

दुबई : आंतरराष्ट्रीय 'एअर शो'मध्ये हवाई कसरती करत असताना भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. काही परदेशी

Bangladesh Earthquake : क्रिकेट सामन्यावर भूकंपाचा ब्रेक! ६ ठार, २०० जखमी, बांगलादेशात ५.७ रिश्टर स्केल भूकंपाचा कहर; १० मजली इमारत एका बाजूला झुकली

ढाका : बांगलादेशमध्ये आज, २१ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. या

ऐतिहासिक! भारत आणि इस्त्राईलमध्ये मुक्त व्यापार करार, सर्व्हीस सेक्टरला होणार फायदा

तेल अवीवः तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलचा संबंध घट्ट करणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच