Murder : चिकनवरून झाला वाद, लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

जयपूर: राजस्थानच्या(rajasthan) अलवरमधील तिजारा भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या(murder) केली. खरंतर, मोठा भाऊ चिकन घेऊन आला होता. त्यावेळेस त्याने लहान भावाला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. छोट्या भावाने चाकूने मोठ्या भावावर हल्ला केला. यावेळेस लहान भावाने चाकूने धारदार वार केले.


मिळालेल्या माहितीनुसार, तिजारा ठाणेंतर्गत शाबाद गावातील निवसी किशोरी लालची तीन मुले होती. तीनही मजुरी करून घर चालवत होते. यातील एकजण चिकन घेऊन घाला. भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून जगदीश नाराज झाला आणि त्याने चिकन बनवण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.


दोघांच्या भांडणादरम्यान आई तेथे भांडण सोडवण्यासाठी आली मात्र दोघांनी तिला धक्का दिला. यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमले आणि दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद वाढत गेला. या दरम्यान, जगदीशने घरात ठेवलेला चाकू घेऊन भड्डनच्या पोटात घुसवला. जगदीशने अनेक वेळा चाकूने हल्ला केला. यानंतर जगदीश त्या ठिकाणाहून पळून गेला.


या दरम्यान कुटुंबियांनी भुड्डनला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अलवर येथे नेण्यास सांगितले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



गावकऱ्यांच्या सूचनेनंतर पोहोचले पोलीस


गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह हाती घेत पोस्टमार्टेम केले. तीनही भाऊ मजुरी करत होते. यावेळेस चिकन बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. कुटुंबियांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळेस जगदीशने आपल्या भावावर चाकूने हल्ला केला.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.