Murder : चिकनवरून झाला वाद, लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

जयपूर: राजस्थानच्या(rajasthan) अलवरमधील तिजारा भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या(murder) केली. खरंतर, मोठा भाऊ चिकन घेऊन आला होता. त्यावेळेस त्याने लहान भावाला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. छोट्या भावाने चाकूने मोठ्या भावावर हल्ला केला. यावेळेस लहान भावाने चाकूने धारदार वार केले.


मिळालेल्या माहितीनुसार, तिजारा ठाणेंतर्गत शाबाद गावातील निवसी किशोरी लालची तीन मुले होती. तीनही मजुरी करून घर चालवत होते. यातील एकजण चिकन घेऊन घाला. भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून जगदीश नाराज झाला आणि त्याने चिकन बनवण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.


दोघांच्या भांडणादरम्यान आई तेथे भांडण सोडवण्यासाठी आली मात्र दोघांनी तिला धक्का दिला. यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमले आणि दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद वाढत गेला. या दरम्यान, जगदीशने घरात ठेवलेला चाकू घेऊन भड्डनच्या पोटात घुसवला. जगदीशने अनेक वेळा चाकूने हल्ला केला. यानंतर जगदीश त्या ठिकाणाहून पळून गेला.


या दरम्यान कुटुंबियांनी भुड्डनला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अलवर येथे नेण्यास सांगितले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



गावकऱ्यांच्या सूचनेनंतर पोहोचले पोलीस


गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह हाती घेत पोस्टमार्टेम केले. तीनही भाऊ मजुरी करत होते. यावेळेस चिकन बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. कुटुंबियांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळेस जगदीशने आपल्या भावावर चाकूने हल्ला केला.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे