नवी मुंबई : अयोध्यावरून आलेल्या पवित्र ‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने जय श्रीराम घोषणेत, शंख नाद करत, पवित्र मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले.
अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम लला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहे.
‘अक्षत: कलश यात्रा’ चे स्वागत करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृहनेता रवींद्र इथापे, भाजपाचे महामंत्री सुरज पाटील, अनंत सुतार, महामंत्री शशिकांत राऊत, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, महिला अध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईतील तमाम जनता मंगल कलशाचे स्वागत करत आहे. अक्षत: कलश प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात जाईल. लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. हे फक्त कलशाचे दर्शन आहे. मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सगळे काही पहायला मिळेल. नवी मुंबईच्या जनतेला सांगेन की, या आणि कलशाचे दर्शन घ्या. राममंदिराचे उद्घाटन २२ तारखेला होणार आहे. परंतु दर्शनाचा लाभ आताच मिळेल. युद्धानंतर प्रभू रामचंद्र परतले होते. तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे. आता २२ जानेवारीची प्रतिक्षा आणि आतुरता आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…