‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत स्वागत

नवी मुंबई : अयोध्यावरून आलेल्या पवित्र ‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने जय श्रीराम घोषणेत, शंख नाद करत, पवित्र मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले.


अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम लला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहे.


‘अक्षत: कलश यात्रा’ चे स्वागत करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृहनेता रवींद्र इथापे, भाजपाचे महामंत्री सुरज पाटील, अनंत सुतार, महामंत्री शशिकांत राऊत, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, महिला अध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईतील तमाम जनता मंगल कलशाचे स्वागत करत आहे. अक्षत: कलश प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात जाईल. लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. हे फक्त कलशाचे दर्शन आहे. मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सगळे काही पहायला मिळेल. नवी मुंबईच्या जनतेला सांगेन की, या आणि कलशाचे दर्शन घ्या. राममंदिराचे उद्घाटन २२ तारखेला होणार आहे. परंतु दर्शनाचा लाभ आताच मिळेल. युद्धानंतर प्रभू रामचंद्र परतले होते. तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे. आता २२ जानेवारीची प्रतिक्षा आणि आतुरता आहे.

Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात