‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत स्वागत

नवी मुंबई : अयोध्यावरून आलेल्या पवित्र ‘अक्षत: कलश यात्रा’ चे नवी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने जय श्रीराम घोषणेत, शंख नाद करत, पवित्र मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले.


अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम लला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहे.


‘अक्षत: कलश यात्रा’ चे स्वागत करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृहनेता रवींद्र इथापे, भाजपाचे महामंत्री सुरज पाटील, अनंत सुतार, महामंत्री शशिकांत राऊत, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, महिला अध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईतील तमाम जनता मंगल कलशाचे स्वागत करत आहे. अक्षत: कलश प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात जाईल. लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. हे फक्त कलशाचे दर्शन आहे. मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सगळे काही पहायला मिळेल. नवी मुंबईच्या जनतेला सांगेन की, या आणि कलशाचे दर्शन घ्या. राममंदिराचे उद्घाटन २२ तारखेला होणार आहे. परंतु दर्शनाचा लाभ आताच मिळेल. युद्धानंतर प्रभू रामचंद्र परतले होते. तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे. आता २२ जानेवारीची प्रतिक्षा आणि आतुरता आहे.

Comments
Add Comment

पगारातून जास्त पीएफ कापला जाणार? नवीन नियमांमुळे वेतन रचनेत झाले मोठे बदल

मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या