Rajasthan: आज बनणार राजस्थानचे नवे सरकार, भजनलाल शर्मा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत(rajasthan assembly election) दमदार विजय मिळवल्यानंतर आता तेथे नवे सरकार स्थापन होण्यासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी भाजपने बंपर विजय मिळवला. भाजपने विजयानंतर भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. भजनलाल यांच्याशिवया भाजपने राजस्थानात दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही लावला. दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. हे तिघेही शुक्रवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.


राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र हे राज्याचे नवे मुख्यमंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राजस्थानातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. अल्बर्ट हॉलबाहेरील रामनिवास बाग येथे हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.


भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा हे कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यात संपूर्ण राजस्थानातील कार्यकर्ते असणार आहेत. अशातच विविध कार्यक्रमांसाठी भाजपने प्रदेश अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हरवत १९९ विधानसभा जागांपैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला येथे केवळ ६९ जागा मिळाल्या. विजयानंतर राजस्थानातील मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Comments
Add Comment

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन

Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी

NEET Exam : कडक सुरक्षा आणि कडक नियमांमध्ये ‘नीट’ परीक्षा उशिरा आलेल्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळ

नवी दिल्ली : ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्यानंतर, रविवारी देशभरात कडक सुरक्षेमध्ये

Solicitor General Tushar Mehta: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या तीन वर्षांसाठी फेरनियुक्तीसाठी मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती

PM Modi : दिल्ली विमानतळावर नरेंद्र मोदी ४५ मिनिटे थांबेल ! काय झालं असेल ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित

Tamil Nadu : तामिळनाडूत अमोनिया गॅस गळती; ७ कामगारांचा मृत्यू

चेन्नई : तिरुवल्लूर जिल्ह्यातील (तामिळनाडू) पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावात असलेल्या सेंट पीटर्स अँड पॉल