16 MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मिळाली मुदतवाढ

आता 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल


मुंबई : शिवसेना व ठाकरे गट (Shivsena Vs Thackeray group) यांच्यातील आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification) प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणीच्या निकालाची वर्षभराहून अधिक काळ प्रतिक्षा आहे. त्यातच हा निकाल आता आणखी लांबणीवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे हा निकाल लावण्याची जबाबदारी सोपवली आहे.


सुनावणीसाठी नार्वेकरांनी दोन वेळा वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबर ही मुदत दिली होती. त्यामुळे या वर्षाच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल अशी चिन्हे होती. मात्र, आता राहुल नार्वेकरांच्या विनंतीवरुन या निकालासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे.


१६ आमदारांच्या निलंबन प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे २१ दिवसांचा अधिक वेळ म्हणजेच २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ करण्याची विनंती केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २१ ऐवजी १० दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे निकाल पुढच्या वर्षी ढकलला गेला आहे. निकाल लांबणीवर गेला असला तरीही तो संक्रांतीच्या आत लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या गटावर संक्रांत येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर, हा निकाल राखून ठेवला जाईल. कारण, निकाल देण्यापूर्वी दोन्ही बाजुंचा दस्तावेज वाचून, अभ्यासून पाहावा लागणार आहे. त्यामुळे, निकालपत्र तयार करुन निकाल जाहीर करण्यासाठी वेळ लागणार आहे, अशी बाजू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता शिवसेना आमदार अपात्रतेवर १० जानेवारी २०२४ किंवा तत्पूर्वी निकाल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची

शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले