16 MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मिळाली मुदतवाढ

आता 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल


मुंबई : शिवसेना व ठाकरे गट (Shivsena Vs Thackeray group) यांच्यातील आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification) प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणीच्या निकालाची वर्षभराहून अधिक काळ प्रतिक्षा आहे. त्यातच हा निकाल आता आणखी लांबणीवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे हा निकाल लावण्याची जबाबदारी सोपवली आहे.


सुनावणीसाठी नार्वेकरांनी दोन वेळा वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबर ही मुदत दिली होती. त्यामुळे या वर्षाच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल अशी चिन्हे होती. मात्र, आता राहुल नार्वेकरांच्या विनंतीवरुन या निकालासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे.


१६ आमदारांच्या निलंबन प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे २१ दिवसांचा अधिक वेळ म्हणजेच २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ करण्याची विनंती केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २१ ऐवजी १० दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे निकाल पुढच्या वर्षी ढकलला गेला आहे. निकाल लांबणीवर गेला असला तरीही तो संक्रांतीच्या आत लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या गटावर संक्रांत येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर, हा निकाल राखून ठेवला जाईल. कारण, निकाल देण्यापूर्वी दोन्ही बाजुंचा दस्तावेज वाचून, अभ्यासून पाहावा लागणार आहे. त्यामुळे, निकालपत्र तयार करुन निकाल जाहीर करण्यासाठी वेळ लागणार आहे, अशी बाजू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता शिवसेना आमदार अपात्रतेवर १० जानेवारी २०२४ किंवा तत्पूर्वी निकाल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.