IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-२०मध्ये हरवत भारताची मालिकेत बरोबरी

  59

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने(team india) तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०६ धावांनी हरवत मालिकेत १-१ शी बरोबरी साधली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) प्रचंड खुश दिसत होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सूर्याच्या शतकाने मोठी भूमिका निभावली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅचसह प्लेयर ऑफ दी सीरिज हा अवॉर्डही देण्यात आला.


बॉलिंगमध्ये बर्थडे बॉय कुलदीप यादवने ५ विकेट मिळवल्या. याशिवाय फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्याने आपली स्थिती सांगितली. मी चांगला आहे. मी चालत आहे तर चांगला आहे. नेहमी एक चांगली फिलिंग. जेव्हा विजय मिळतो तेव्हा आनंद होतो.


भारतीय कर्णधाराने कुलदीप यादवचेही यावेळेस कौतुक केले. कुलदीपबद्दल सूर्या म्हणाला, बर्थडेच्या दिवशी पाच विकेट त्याने स्वत:ला शानदार गिफ्ट दिले. कुलदीपने केवळ २.५ षटकांत १७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. कुलदीपबाबत तो म्हणाला, तो कधीच खुश नाही आहे. तो नेहमीच भुकेला आहे. हे बर्थडेसाठी चांगले गिफ्ट होते. माझ्या मते आपला खेळ जाणणे गरजेचे असते. मी फक्त गेलो आणि एन्जॉय केला.


आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे हा तिसरा सामना भारतासाठी करो वा मरो होता. या सामन्यात भारतीय संघाने २०२ धावांचे आव्हान दिले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५६ बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.


मात्र याला उत्तर देण्यासाठी उतरलेला आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांवर गारद झाला. त्यांनी हा सामना १०६ धावांनी गमावला. या पद्धतीने भारताने मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेसाठी सामन्यात डेविड मिलरने सर्वाधिक ३५ तर एडन मार्करमने २५ धावा केल्या.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये