IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-२०मध्ये हरवत भारताची मालिकेत बरोबरी

  52

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने(team india) तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०६ धावांनी हरवत मालिकेत १-१ शी बरोबरी साधली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) प्रचंड खुश दिसत होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सूर्याच्या शतकाने मोठी भूमिका निभावली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅचसह प्लेयर ऑफ दी सीरिज हा अवॉर्डही देण्यात आला.


बॉलिंगमध्ये बर्थडे बॉय कुलदीप यादवने ५ विकेट मिळवल्या. याशिवाय फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्याने आपली स्थिती सांगितली. मी चांगला आहे. मी चालत आहे तर चांगला आहे. नेहमी एक चांगली फिलिंग. जेव्हा विजय मिळतो तेव्हा आनंद होतो.


भारतीय कर्णधाराने कुलदीप यादवचेही यावेळेस कौतुक केले. कुलदीपबद्दल सूर्या म्हणाला, बर्थडेच्या दिवशी पाच विकेट त्याने स्वत:ला शानदार गिफ्ट दिले. कुलदीपने केवळ २.५ षटकांत १७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. कुलदीपबाबत तो म्हणाला, तो कधीच खुश नाही आहे. तो नेहमीच भुकेला आहे. हे बर्थडेसाठी चांगले गिफ्ट होते. माझ्या मते आपला खेळ जाणणे गरजेचे असते. मी फक्त गेलो आणि एन्जॉय केला.


आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे हा तिसरा सामना भारतासाठी करो वा मरो होता. या सामन्यात भारतीय संघाने २०२ धावांचे आव्हान दिले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५६ बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.


मात्र याला उत्तर देण्यासाठी उतरलेला आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांवर गारद झाला. त्यांनी हा सामना १०६ धावांनी गमावला. या पद्धतीने भारताने मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेसाठी सामन्यात डेविड मिलरने सर्वाधिक ३५ तर एडन मार्करमने २५ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार