IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-२०मध्ये हरवत भारताची मालिकेत बरोबरी

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने(team india) तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०६ धावांनी हरवत मालिकेत १-१ शी बरोबरी साधली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) प्रचंड खुश दिसत होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सूर्याच्या शतकाने मोठी भूमिका निभावली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅचसह प्लेयर ऑफ दी सीरिज हा अवॉर्डही देण्यात आला.


बॉलिंगमध्ये बर्थडे बॉय कुलदीप यादवने ५ विकेट मिळवल्या. याशिवाय फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्याने आपली स्थिती सांगितली. मी चांगला आहे. मी चालत आहे तर चांगला आहे. नेहमी एक चांगली फिलिंग. जेव्हा विजय मिळतो तेव्हा आनंद होतो.


भारतीय कर्णधाराने कुलदीप यादवचेही यावेळेस कौतुक केले. कुलदीपबद्दल सूर्या म्हणाला, बर्थडेच्या दिवशी पाच विकेट त्याने स्वत:ला शानदार गिफ्ट दिले. कुलदीपने केवळ २.५ षटकांत १७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. कुलदीपबाबत तो म्हणाला, तो कधीच खुश नाही आहे. तो नेहमीच भुकेला आहे. हे बर्थडेसाठी चांगले गिफ्ट होते. माझ्या मते आपला खेळ जाणणे गरजेचे असते. मी फक्त गेलो आणि एन्जॉय केला.


आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे हा तिसरा सामना भारतासाठी करो वा मरो होता. या सामन्यात भारतीय संघाने २०२ धावांचे आव्हान दिले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५६ बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.


मात्र याला उत्तर देण्यासाठी उतरलेला आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांवर गारद झाला. त्यांनी हा सामना १०६ धावांनी गमावला. या पद्धतीने भारताने मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेसाठी सामन्यात डेविड मिलरने सर्वाधिक ३५ तर एडन मार्करमने २५ धावा केल्या.

Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने