IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-२०मध्ये हरवत भारताची मालिकेत बरोबरी

Share

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने(team india) तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०६ धावांनी हरवत मालिकेत १-१ शी बरोबरी साधली. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) प्रचंड खुश दिसत होता. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सूर्याच्या शतकाने मोठी भूमिका निभावली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅचसह प्लेयर ऑफ दी सीरिज हा अवॉर्डही देण्यात आला.

बॉलिंगमध्ये बर्थडे बॉय कुलदीप यादवने ५ विकेट मिळवल्या. याशिवाय फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर सूर्याने आपली स्थिती सांगितली. मी चांगला आहे. मी चालत आहे तर चांगला आहे. नेहमी एक चांगली फिलिंग. जेव्हा विजय मिळतो तेव्हा आनंद होतो.

भारतीय कर्णधाराने कुलदीप यादवचेही यावेळेस कौतुक केले. कुलदीपबद्दल सूर्या म्हणाला, बर्थडेच्या दिवशी पाच विकेट त्याने स्वत:ला शानदार गिफ्ट दिले. कुलदीपने केवळ २.५ षटकांत १७ धावा देत ५ विकेट मिळवल्या. कुलदीपबाबत तो म्हणाला, तो कधीच खुश नाही आहे. तो नेहमीच भुकेला आहे. हे बर्थडेसाठी चांगले गिफ्ट होते. माझ्या मते आपला खेळ जाणणे गरजेचे असते. मी फक्त गेलो आणि एन्जॉय केला.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यामुळे हा तिसरा सामना भारतासाठी करो वा मरो होता. या सामन्यात भारतीय संघाने २०२ धावांचे आव्हान दिले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५६ बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.

मात्र याला उत्तर देण्यासाठी उतरलेला आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांवर गारद झाला. त्यांनी हा सामना १०६ धावांनी गमावला. या पद्धतीने भारताने मालिकेत बरोबरी साधली. आफ्रिकेसाठी सामन्यात डेविड मिलरने सर्वाधिक ३५ तर एडन मार्करमने २५ धावा केल्या.

Recent Posts

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

13 mins ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

30 mins ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

2 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

2 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

4 hours ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

13 hours ago