IND vs SA: तिसऱ्या टी-२०मध्ये कोण ठरणार अव्वल, भारत की दक्षिण आफ्रिका?

Share

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) ३ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना आज म्हणजेच गुरूवारी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे की जोहान्सबर्गची पिच कोणाला साथ देणार फलंदाजांना की गोलंदाजांना. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न आज भारतीय संघ करेल.

जोहान्सबर्गमधील न्यू वांडरर्स स्टेडियमची विकेट फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. येथे चौकार तसेच षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात या पिचवर हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, सुरूवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.

या विकेटवर पाठलाग करणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघापेक्षा फायद्यात राहू शकते. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला १५ सामन्यात विजय मिळाल आहे तर पाठलाग करणारा संघ १७ सामन्यात विजयी झाला आहे. या विकेटवर सगळ्यात सर्वोच्च धावसंख्या २६० इतकी आहे जी श्रीलंकेने केनियाविरुद्ध २००७मध्ये केली होती. तर सगळ्यात कमी धावसंख्या ८३ आहे.

भारताने जोहान्सबर्ग येथे ५ टी-२० सामने ेखेळले यातील ३मध्ये त्यांना विजय मिळवता आला तर २मध्ये पराभवास सामोरे जावे लागले.

कसे असेल हवामान

अॅक्युवेदरच्या माहितीनुसार जोहान्सबर्गमध्ये गुरूवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही. याचा अर्थ संपूर्ण २० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. तापमान २६ डिग्री ते २० डिग्री सेल्सियसमध्ये राहण्याची शक्यता आहे.

वांडरर्समध्ये ३२ टी-२० सामने

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने २४ टी-२० सामने खेळले आहेत यातील १४ सामन्यांत त्यांना विजय मिळाला तर १० सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत टी-२०मध्ये २५ वेळा आमनेसामने आलेत. येथे भारताला १३ तर दक्षिण आफ्रिकेला ११ सामन्यांत विजय मिळाला.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

24 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago