राज्यात २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती

Share

संतोष राऊळ (नागपूर, विधान भवन) – राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

विधान परिषदेत कोकण विभागातील नैना या प्रकल्पावर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सामंत यांनी ही माहिती दिली. आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता. यावेळी जयंत पाटील यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा व ५० टक्के नोकऱ्या ह्या त्या परिसरातील नागरिकांना मिळाव्यात अशी मागणी यावेळी पाटील यांनी लावून धरली.

या चर्चेत अनिकेत तटकरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेत विविध प्रश्न मांडले तसेच सूचनासुद्धा दिल्यायावर उत्तर देताना सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेऊ, त्यासाठी विशेष बैठक किंवा जनसुनावणी घेऊ, असे आश्वासन दिले. रायगड मधील एमआयडीसी ही सर्वांत मोठी लँड बँक आहे. यात सेझ मधील ७५ टक्के जमीन ही खासगी आहे तर उर्वरित २५ टक्के जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन करुन घेतली आहे.

खासगी जागांचे काय करायचे यावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. मात्र ज्या जागा उद्योगांसाठी घेतल्या आणि त्यावर उद्योग आलेच नाहीत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago