राज्यात २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती

  87

संतोष राऊळ (नागपूर, विधान भवन) - राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.


विधान परिषदेत कोकण विभागातील नैना या प्रकल्पावर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सामंत यांनी ही माहिती दिली. आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता. यावेळी जयंत पाटील यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा व ५० टक्के नोकऱ्या ह्या त्या परिसरातील नागरिकांना मिळाव्यात अशी मागणी यावेळी पाटील यांनी लावून धरली.


या चर्चेत अनिकेत तटकरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेत विविध प्रश्न मांडले तसेच सूचनासुद्धा दिल्यायावर उत्तर देताना सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेऊ, त्यासाठी विशेष बैठक किंवा जनसुनावणी घेऊ, असे आश्वासन दिले. रायगड मधील एमआयडीसी ही सर्वांत मोठी लँड बँक आहे. यात सेझ मधील ७५ टक्के जमीन ही खासगी आहे तर उर्वरित २५ टक्के जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन करुन घेतली आहे.


खासगी जागांचे काय करायचे यावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. मात्र ज्या जागा उद्योगांसाठी घेतल्या आणि त्यावर उद्योग आलेच नाहीत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला