INDIA Alliance Meeting : घमंडियांची बैठक की रुसवेफुगवे?

एक आजारी, दुसरा नाराज तर तिसर्‍याला माहितच नाही!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत जे खुलासे केले आहेत, त्यावरुन इंडिया ही आघाडी (INDIA Alliance) नव्हे तर मतभेद असूनही एकत्र असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, हेच स्पष्ट होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पहिलीच बैठक बोलावली आहे. पण या बैठकीसाठी महत्त्वाच्या नेत्यांच्या अुनपस्थितीची कारणे मजेशीर आहेत.


आज दिल्ली येथे खरगेंनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar)उपस्थित राहू शकणार नाहीत. नितीश कुमार आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याचे देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बैठकीआधीच इंडिया आघाडीत रुसवेफुगवे असल्याचं दिसून येत आहे.


बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तर आपल्याला बैठकीबद्दल कल्पनाच नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.


तर दुसरीकडे आघाडीचा धर्म म्हणून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. पण मुख्य नेतेच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याने ही बैठक कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे. शिवाय काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेसचं वर्चस्व कमी झालं आहे, त्यामुळे वाटाघाटी करताना घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय