नवी दिल्ली: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत तीन ठिकाणू भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस संपूर्ण बहुमताने सरकार बनवत आहे. मध्य प्रदेशात भाजपचा बंपर विजय झाला तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही यावेळी कमळ फुललले. तेलंगणामध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या केसीआरला यावेळी झटका बसला. येथे काँग्रेसने विजय मिळवला. आता सवाल आहे की या राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण बनणार?
मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा ताज शिवराम यांच्या माथ्यावर बसू शकतो. ते राज्ायातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शिवराज बुधनी विधानसभा येथून निवडणूक लढवत होते. २००६ पासून येथे त्यांचा दबदबा राहिला आहे. शिवराज यांनी १९९० मध्ये येथून विजय मिळवला होता. त्यानंतर २००६मध्ये ते पु्न्हा बुधनी येथून जिंकून आले होते. आतापर्यंत त्यांचा या मतदारसंघावर कब्जा राहिला आहे. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री आहेत.
राजस्थानात भाजपचे आमदार महंत बालकनाथ या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच महंत बालकनाथ हे नाथ समुदायाचे आहेत आणि त्यांच्या संसदीय क्षेत्रात मोठ्या संख्येने त्यांना मानणारे तसेच समर्थक आहेत. भाजपकडून ते तिजारा मतदारसंघातू निवडून आले. येथे त्यांनी काँग्रेसच्या इमरान खानला हरवले. राजस्थानात काँग्रेसपासून लोकांना मुक्ती हवी होती त्याच मुळे भाजपला हा विजय सोपा झाला असे बालकनाथ म्हणाले. ४० वर्षीय बालकनाथ यांनी वयाच्या ६व्या वर्षी संन्यास घेतला होता.
राजस्थानात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारामध्ये भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही यांचेही नाव घेतले जात आहे. त्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होत्या. दरमा्यान, त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रमण सिंह मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. १९६६-६७मध्ये त्यांचे राजकीय करिअर सुरू झाले होते. २००३मध्ये ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले होते. ते तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले आहेत. ते २००८ पासून राजनांदगाव मतदारसंघातू निवडून येत आहेत.
तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात पक्षाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तसेच १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला धक्का दिला. पक्ष कार्यकर्त्यांकडून रेड्डी यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. त्यातच चर्चा आहे की त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…