VIDEO: शमीने आपल्या कृतीने जिंकली मने, कार अपघातानंतर लोकांचा वाचवला जीव

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(mohammad shami) विश्वचषक २०२३ने(world cup 2023) कमालीची कामगिरी क्ली. त्याने सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. यातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लोकांची मने जिंकतील असे काम केले आहे. कार अपघातात जखमी झालेल्या लोकांना शमीने केवळ वाचवलेच नाही तर त्यांची मदतही केली. भारतीय वेगवान गोलंदाज शमीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.





विश्वचषकानंतर ब्रेकवर शमी


विश्वचषक २०२३मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना १० सामने जिंकले होते. दरम्यान, फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला आहे. दुसरा सामना आज तिरूअनंतपुरम येथे खेळवला जात आहे. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्यय होऊ शकतो.


टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. या दौऱ्यात संघाला ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.

Comments
Add Comment

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

T20 World Cup 2026: 'या' खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात

श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या