IND vs AUS: दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर टेकले गुडघे, भारताची मालिकेत २-० अशी आघाडी

तिरूअनंतपुरम: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या टी-२० सामन्यात हरवले. यावेळेस तिरूअनंतपुरम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर हे मोठे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. भारतासाठी रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट मिळवल्या.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी ऋतुराज गायकवाड यांनी ५८ धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जायसवालने जबरदस्त फलंदाजी करताना ५३ आणि ईशान किशनने ५२ धावांची खेळी केली.

सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे


२३६ धावांचे विशाल आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरूवातीपासूनच गुडघे टेकले होते. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ओव्हरमध्ये ३५ धावांमध्ये पहिला विकेट गमावला होता. पाचव्या ओव्हरमध्ये लगेचच जोश इंग्लिस यांची विकेट गेली. सहाव्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल १२ धावांवर अक्षर पटेलकडून बाद झाला. स्टीव्ह स्मिथच्या रूपात ऑस्ट्रेलियाला चौथा झटका बसला. यानंतर पाचव्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिस आणि टीम डेविड यांनी ३८ बॉलमध्ये ८१ धावांची खेळी केली.

भारतीय गोलंदाज सातत्याने विकेट घेत होते. भारतासाठी रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट मिळवल्या. या दरम्यान बिश्नोईने ४ ओव्हरमध्ये ३२ आणि कृ्ष्णाने १४ ओव्हरमध्ये ४१ धावा दिल्या. याशिवाय अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत