Mumbai Airport: मुंबई एअरपोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी, बिटकॉईनने मागितले दहा लाख डॉलर

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत(mumbai) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या(airport) टर्मिनल २ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी गुरूवारी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. यात ४८ तासांच्या आत बिटकॉईनच्या रूपात १० लाख डॉलरची मागणी करण्यात आली आहे.


या प्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ आणि ५०५(१)(ब) अंतर्गत केस दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की मेलच्या आधारावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार quaidacasrol@gmail.com नावाच्या आयडीने हा धमकीचा मेसेज मिळाला. पोलिसांनी पुढे सांगितले की आरोपीने हा इमेल गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये पाठवला आहे.



काय लिहिले होते ईमेलमध्ये?


धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते की, विषय - ब्लास्ट. ही तुमच्या विमानतळासाठी शेवटची सूचना आहे. जर बिटकॉईनमध्ये १० लाख डॉलर पत्त्यावर ट्रान्सफर केले नाही तर आम्ही ४८ तासांच्या आत टर्मिनल २चा विस्फोट करून उडवून देऊ. आणखी एक अलर्ट २४ तासांनंतर पाठवण्यात येईल.


दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहता विमानतळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच धमकीचा ईमेल ज्या आयपी अॅड्रेसने पाठवण्यात आला आहे त्याचीही माहिती मिळवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या