नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(pm narendra modi) केलेल्या अपमानजनक विधानाबाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी झटका दिला. या प्रकरणी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजपने बुधवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पार्टी सचिव राधा मोहन दास अग्रवाल आणि एका अन्य पदाधिकारी ओम पाठसह प्रतिनिधीमंडळामध्ये सामील इतर नेत्यांनी राहुल गांधीचे हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले होते.
राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारताने ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ ४३ षटकांत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…