Rajasthan Political leaders : राजस्थानमधील दिग्गज नेतेमंडळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या गळाला...

काय आहे पक्षप्रवेशाचं कारण?


जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील (Congress) दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची (BJP) वाट धरली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असून प्रतिष्ठित नेते भाजपच्या हाती लागल्याने भाजपला फायदा होणार आहे. राजस्थानमध्ये असलेल्या विविध महामंडळे, प्राधिकरणे, परीक्षा आयोग यांवर गेल्या पाच वर्षात नेमणुकाच झालेल्या नाहीत. या सर्व प्राधिकरणांची किंवा आयोगांची जबाबदारी सध्या अधिकाऱ्यांवरच आहे. यातून निर्माण झालेल्या नाराजीतून नेत्यांनी भाजपला साथ देणे पसंत केले आहे.


सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य आहे. पण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यावर काँग्रेसमधील नेतेमंडळी नाराज होती. याचे कारण म्हणजे राज्यातील महामंडळे, प्राधिकरणे आणि आयोग यांच्यावरील राजकीय व्यक्तींच्या नियुक्त्यांकडे संबंधित राज्यातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून बघितले जाते. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षात जोधपूर जिल्ह्यातील अशा एकाही प्राधिकरण किंवा महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. आधीच उमेदवारीवरून असलेल्या नाराजीत यामुळे आणखी भर पडली आणि नेते भाजपकडे वळले.



जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दादिच भाजपसोबत


मुख्यमंत्री गेहलोत यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दादिच. थेट जनतेतून आणि शहरातील तीन विधानसभा मतदार संघातून ते ६० हजारपेक्षा अधिक मतांनी महापौर म्हणून विजयी झाले होते. दादिच हे ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी सुरसागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना डावलून या मतदार संघातून काँग्रेसने युवा कार्यकर्ते शाहजाद खान यांना उमेदवारी दिली. आपल्याला डावलल्याचे लक्षात आल्यानंतर दादिच यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. आता या मतदार संघात भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिल्याने त्यांना दादिच यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार आहे.



ब्राह्मण समाजाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी


ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष कन्हैयालाल पारिख यांच्या स्नुषा आणि महापौर पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार पूजा पारिख यांनाही असेच डावलण्यात आल्यानंतर त्यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शाम खिचड, करुणानिधी व्यास, अजय त्रिवेदी असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यातील व्यास यांचा जोधपूर शहरात मोठा प्रभाव आहे, ते ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांची मदत सुरसागरसह अन्य मतदार संघात झाली असती, पण त्यांना डावलल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत.


Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम