16 MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी

  96

कधी लागणार हा प्रश्न मार्गी?


मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्षात आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) निकाल कधी लागणार, हा एक मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. मागच्या २ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरवर ढकलण्यात आली. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे.


दीड तास झालेल्या २ नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केले असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.


विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. विधानसभा अध्यक्ष त्यावेळी म्हणाले होते की, मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय. त्यानुसार अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.


दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार आजपासून पुढील सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.