India Vs Australia WC Finale : ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडे ट्रॉफी गेली!

मिचेल मार्शच्या 'त्या' फोटोवर भारतीय क्रिकेटप्रेमींचा संताप...


मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India Vs Australia) पराभवानंतर करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला तर भारताची तिसर्‍यांदा वर्ल्डकपवर नाव कोरायची संधी हुकली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा जल्लोष सुरु आहे. मात्र, त्या जल्लोषादरम्यान पॅट कमिन्स (Pat Cummins) या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आपल्या इन्स्टा अकाऊंटला शेअर केलेल्या मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) एका फोटोमुळे भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड संतापले आहेत.


व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेलने वर्ल्डकप ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवली आहे आणि तो सोफ्यावर दिमाखात हातात बिअरची बाटली घेऊन बसला आहे. इतक्या मेहनतीने मिळवलेल्या ट्रॉफीला अशा प्रकारे मानसन्मान न देणं भारतीयांना मात्र रुचलेलं नाही. ट्रॉफीचा आदर करण्याचा सल्ला त्याला भारतीयांनी दिला आहे.







काही क्रिकेटप्रेमींनी भारतीय खेळाडूंचे हातात वर्ल्डकप घेतलेले फोटो शेअर केले आहेत. या ट्रॉफीची किंमत काय आहे हे भारतीय संघाला विचारा, असं त्यांनी म्हटलं आहे. 'ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडे ट्रॉफी गेली!' अशा कमेंट्स काहीजणांनी केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डालाही त्यांच्या खेळाडूंना याबाबत शिकवण्याचा सल्ला दिला आहे.




Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात