५ राज्यांत १७६० कोटींपेक्षा जास्त रूपयांचे सामान, कॅश आणि दारू जप्त, निवडणूक आयोगाचा धक्कादायक खुलासा

Share

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पाच निवडणूक राज्यांत १७६० कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांच्या वस्तू, मादक पदार्त, कॅश, दारू तसेच महागडे सामान ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आयोगाने दावा केला आहे की या सर्व गोष्टी मतदारांना प्रभावित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या.

आयोगाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जप्त केलेल्या राज्यांमधील वस्तू या २०१८मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जप्त केलेल्या गोष्टींच्या सातपट अधिक रूपयांच्या आहेत.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर राजस्थानात २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाच्या विधानानुसार याआधी सहा राज्यांत गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुकीदरम्यान १४०० रूपयांहून अधिक किंमतीच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम ११ पट अधिक होती.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व उमेदवारांना तसेच पक्षांना सांगितले होते की प्रलोभनमुक्त निवडणुकीवर जोर दिला होता.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

9 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

29 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago