५ राज्यांत १७६० कोटींपेक्षा जास्त रूपयांचे सामान, कॅश आणि दारू जप्त, निवडणूक आयोगाचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पाच निवडणूक राज्यांत १७६० कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांच्या वस्तू, मादक पदार्त, कॅश, दारू तसेच महागडे सामान ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आयोगाने दावा केला आहे की या सर्व गोष्टी मतदारांना प्रभावित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या.


आयोगाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जप्त केलेल्या राज्यांमधील वस्तू या २०१८मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जप्त केलेल्या गोष्टींच्या सातपट अधिक रूपयांच्या आहेत.


मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर राजस्थानात २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाच्या विधानानुसार याआधी सहा राज्यांत गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुकीदरम्यान १४०० रूपयांहून अधिक किंमतीच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम ११ पट अधिक होती.


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व उमेदवारांना तसेच पक्षांना सांगितले होते की प्रलोभनमुक्त निवडणुकीवर जोर दिला होता.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या