Poems : काव्यरंग

  22

हिवाळ्याचं पाऊल


बाजेवरती बसून आजोबा
आदेश सोडती बाबाला
खारीक खोबरे घेऊन या रे
लाडक्या माझ्या नाताला

उन्हात बसून टोपी शिवते
आजी सांगते आईला
स्वेटर नवीन घेऊन या रे
लाडक्या माझ्या ताईला

मोठ्ठा आमचा मामा जेव्हा
गावी निघतो यायला
सुकामेवा आणीन म्हणतो
हिवाळ्याचा खायला

जसं पडतं अंगणामध्ये
हिवाळ्याचं पाऊल
आजी, आजा, मामा यांना
लागते पहिली चाहूल

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये
कपडे आणतात ऊबदार
सुकामेवा खाऊन पुष्ठ
तब्येत बनते रुबाबदार
- भानुदास धोत्रे, परभणी

उंदीरमामाचा आजार


गारठणाऱ्या थंडीत
बिळाबाहेर आला उंदीरमामा
अंगात नव्हते स्वेटर
नव्हती कशाची तमा

सकाळी सकाळी
हवा होती गार
खोकलून खोकलून
झाला तो बेजार

दुखू लागले डोके
झाली त्याला सर्दी
बिळातल्या मित्रांची
झाली खूप गर्दी

कुणी दिले चाटन
कुणी दिले औषध कडू
बिचाऱ्या उंदीरमामाला
फुटले मग रडू

विविध घेतली औषधे
तरी वाटेना बरे
उंदीरमामा गेला त्रासून
उपाय संपले सारे

शेवटी एका मित्राचा
उपाय आला कामी
सुंठमिऱ्याचा काढा देऊन
युक्ती शोधली नामी

काही वेळातच उंदीरमामाचा
आजार दूर पळाला
आनंदाच्या भरात म्हणे
चला सर्व खेळायला

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ
Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले