भारत ६ बाद २०३ धावा
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. केएल राहुल बाद झाल्याने भारताचा स्कोअर ४१ षटकांमध्ये ६ बाद २०३ धावा झाला आहे. केएल राहुलने कसेबसे आपले अर्धशतक पूर्ण केले होते. अखेर ६६ धावांवर तो बाद झाला. अखेरच्या ९ षटकाची फलंदाजी शिल्लक आहे. तर राहुलच्या संयमी खेळीमुळे भारताला किमान आपले द्विशतक पूर्ण करता आले आहे.