PM Modi on Mohammed Shami: मोहम्मद शमीचे चाहते झाले पंतप्रधान मोदी, कौतुक करताना बोलले असे काही की...

मुंबई: भारताने न्यूझीलंडला ७० विकेटनी हरवत विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना सात विकेट मिळवले. शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले कौतुक केले.


पंतप्रधान मोदी कौतुक करत म्हटले, आजची सेमीफायनलची मॅच जबरदस्त आणि खास झाली. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेट प्रेमींसाठी येणारी पिढी लक्षात ठेवेल. वेल प्लेड शमी!


य़ा वर्षी विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत २३ विकेट मिळवले आहेत. न्यूझीलंडविुरुद्ध शानदार प्रदर्शनासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.


 


सेमीफायनलमध्ये शमीने मिळवल्या ७ विकेट


भारताने या सामन्यात टॉस जिंकत फलंदाजी करताना ३९७ धावांचा विशाल स्कोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांवर सर्वबाद झाला. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा हा सलग १०वा विजय आहे.


भारताकडून मोहम्मद शमीने ९.५ षटकांत ५७ धावा देत ७ विकेट मिळवल्या. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींशिवाय अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, अनुराग ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या.



विराट कोहलीने तोडला सचिनचा रेकॉर्ड


न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकले. कोहलीने या सामन्यात आपले ५०वे शतक पूर्ण केले. हे शतक ठोकताना कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांचा रेकॉर्ड तोडला.

Comments
Add Comment

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती