World Cup 2023: जर पावसामुळे फायनल-सेमीफायनल रद्द झाला तर काय होणार?

  126

मुंबई: विश्वचषकमध्ये(world cup 2023) लीग स्टेजमध्ये सर्व सामने संपले आहेत. आता फायनल आणि सेमीफायनलचे सामने बाकी आहेत. या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचले आहेत.


सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. तर विश्वचषकातील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये रंगणार आहे. या दोन सामन्यात जिंकणारा संघ फायनलला पोहोचणार आहे. त्यानंतर यांच्यातील विजेते संघ फायनलमध्ये भिडणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे.



रिझर्व्ह डे बाबत आयसीसीने केले कन्फर्म


अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात असा प्रश्न आहे की जर सेमीफायनल आणि फायनल सामन्याच्या वेळेस पाऊस पडला तर काय होणार? याबाबतीत आयसीसीने कन्फर्म केले की दोन्ही सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामन्यासाठी एक एक दिवसाचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.


१५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे १६ नोव्हेंबरला असेल. तर १६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी १७ नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.


२०१९च्या विश्वचषकात भारताचा सेमीफायनचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. यानंतर सामना राखीव दिवशी पूर्ण करण्यात आला होता. यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळेस रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने लीग स्टेजमधील सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने सुरूवातीला चांगले क्रिकेट खेळले होते. मात्र त्यानंतर सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार