Punjab Accident : पंजाबमध्ये तब्बल शंभर गाड्या एकमेकांवर आदळल्या!

अपघाताचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...


पंजाब : देशभरात प्रदूषणाचे (Pollution) प्रमाण प्रचंड वाढले असून ही बाब फार चिंताजनक आहे. अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत, तर दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी श्वास घेतानाही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, शारीरिक समस्या उद्भवत असतानाच आता प्रदूषणामुळे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये प्रदूषणाने दृश्यमानता कमी झाल्यामुळे चालकांना गाडी चालवताना समोरचे नीट दिसले नाही आणि तब्बल १०० गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात (Punjab Accident) झाला.


पंजाबमध्ये लुधियाणामधील खन्ना येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास १०० वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त वाहनांमध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या समोर आली नाही. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारांकरता दाखल करण्यात आले आहे.


सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.



प्रदूषणाची वाढती समस्या


दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये प्रदूषणाची मोठी समस्या आहे. यातच गेले काही दिवस शेतकरी शेतातील तण जाळत आहेत. तसेच फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजवले जात आहेत. याचा परिणाम थंडीतल्या धुक्यांत धूळ, धुर मिळून धुरक्यात होत आहे. यामुळे रात्रीचीच नाही तर दिवसाचीही दृष्यमानता कमी होत आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६