Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर मोठा अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर सोमवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका वयस्कर महिलेसह तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणाऱे कुटंब दिल्ली येथून पुष्करला जात होते. या दरम्यान लक्ष्मणगढ ठाणे क्षेत्रात एक्सप्रेसवेवर ड्रायव्हरला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने डिव्हायडरला धडक मारली.



दिल्ली-एक्सप्रेसवेवर झाला रस्ते अपघात


या घटनेबाबत एसएचओ श्रीरामन मीना यांनी सांगितले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पुलिया नंबर १०७वर चंद्रा का बासजवळ एक कार खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाणे पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.



रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू


दिल्लीत राहणारे निर्मला पाठक(वय ७० वर्षे), अरूण पाठक(४५ वर्षे) तसेच मुस्कान पाठक(वय २० वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर गौतम पाठक(१६ वर्षे) आणि हर्ष पाठक(२० वर्षे) यांची स्थिती गंभीर झाली आहे. यानंतर त्यांना राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



दिल्लीवरून पुष्करला जात होते कुटुंबीय


मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब सकाळी दिल्ली येथून ७ वाजता पुष्करला जात होते. गाडी अरूण पाठक नावाची व्यक्ती चालवत होती. यावेळी झोपेची डुलकी आली. यामुळे कारवरील ताबा सुटला आणि गाडी भिंत तोडून खाली पडली.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला