गुरूग्राम: दिल्लीच्या गुरूग्राम येथे एका चालत्या प्रवासी बसला आग(bus fire) लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आग लागल्यानंतर काही लोकांनी खिडकीतून उडी मारत आपला जीव वाचवला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस गुरूग्राम येथून महोबा येथे जात होती. सुरूवातीला माहिती मिळाली होती की बसच्या खिडकीतून उडी मारत १०-१० लोकांनी आपला जीव वाचवला. दुसरीकडे सूचना मिळताच स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. अडकलेल्या लोकांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, बस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.
दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर बस क्रमांक एआर ०१ के७७०७ या बसमध्ये जेव्हा लोक प्रवासासाठी बसले तेव्हा त्यांना थोडीही कल्पना नव्हती की असे काही घडेल. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की बस आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
आग लागल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. ही दुर्घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माईलस्टोन बिल्डिंगकडे घडली. वॉल्वो टूरिस्ट बसमधून अनेकदा प्रवासी प्रवा करत असतात यात अनेक स्लीप बसेसही असतात.
गुरूग्राम पोलिसांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हायवे ४८, गुरुग्राममध्ये गुगल कंपनीजवळ एक बसमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच श्री विकास अरोडा आयपीएस पोलीस आयुक्त गुरूग्रामसहित गुरूग्राम पोलीस अधिकारी, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…