Bus Fire: प्रवाशांनी भरलेल्या वोल्वो बसला लागली आग, दोघांचा मृत्यू, खिडकीतून उडी मारत प्रवाशांनी वाचवला जीव

  140

गुरूग्राम: दिल्लीच्या गुरूग्राम येथे एका चालत्या प्रवासी बसला आग(bus fire) लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आग लागल्यानंतर काही लोकांनी खिडकीतून उडी मारत आपला जीव वाचवला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ही बस गुरूग्राम येथून महोबा येथे जात होती. सुरूवातीला माहिती मिळाली होती की बसच्या खिडकीतून उडी मारत १०-१० लोकांनी आपला जीव वाचवला. दुसरीकडे सूचना मिळताच स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. अडकलेल्या लोकांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, बस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.


दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर बस क्रमांक एआर ०१ के७७०७ या बसमध्ये जेव्हा लोक प्रवासासाठी बसले तेव्हा त्यांना थोडीही कल्पना नव्हती की असे काही घडेल. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की बस आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आहे.


 


गुरूग्रामच्या माईलस्टोन बिल्डिंगजवळ दुर्घटना


आग लागल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. ही दुर्घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माईलस्टोन बिल्डिंगकडे घडली. वॉल्वो टूरिस्ट बसमधून अनेकदा प्रवासी प्रवा करत असतात यात अनेक स्लीप बसेसही असतात.


 


परिस्थिती नियंत्रणात


गुरूग्राम पोलिसांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हायवे ४८, गुरुग्राममध्ये गुगल कंपनीजवळ एक बसमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच श्री विकास अरोडा आयपीएस पोलीस आयुक्त गुरूग्रामसहित गुरूग्राम पोलीस अधिकारी, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके