मुरबाड ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये शिंदे गटाची व भाजपाची सरशी!

  281

एकमेव कुडवली ग्रामपंचायतीवर उबाठा शिवसेनेने फडकवला झेंडा!


मुरबाड : मुरबाड तालुक्यात नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये शिंदे गट व भाजपचे सरशी दिसून येत आहे तर अजित पवार गट, शरद पवार गट, व इंदिरा काँग्रेस, मनसे या पक्षांना कुठेही खाते उघडता आले नाही.


ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली रामपूर, टेंबरे (बु), नढई, जडई, मढ, चिखले यांच्यासह १५ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने भगवा फडकला आहे. तर आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली पेंढरी, न्हावे,म्हाडस,ओजिवले,साजई, देवगाव,फांगलोशी यांच्यासह १३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच मुरबाड तालुक्यात प्रथमच कुडवली ग्रामपंचायतवर उबाठा गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे थेट सरपंच पुढील प्रमाणे रामपुर- विनायक पोटे, टेंबरे-सुहास केंबारी, नढई -निता टोहके, जडई -संगिता सांवत, यांच्यासह १५ थेट सरपंच पदावर शिंदे गटाने बाजी मारली आहे.


तसेच भाजपाचे थेट सरपंच पुढील प्रमाणे, साजई-पुष्पा सासे, न्हावे-जगदीश हिंदूराव, ओजिवले-परशुराम कातकरी, म्हाडस-वंदना म्हाडसे, यांच्यासह १३ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व दाखवले कुडवली ग्रामपंचायतीवर उबाठा गटाचे रामभाऊ सासे यांची थेट सरपंच पदी निवडून आले आहेत. तसेच कोरावळे गावचा सरपंच हा आपसात बिनविरोध करून ग्रामविकास आघाडीचा झालेला आहे. त्याचे श्रेय कोणी घेऊ नये अशी माहिती माजी सरपंच पांडुरंग धुमाळ यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे.तर सुभाष पवार गटाचे कट्टर समर्थक म्हणून खापरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून सुरेश भांगरथ हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत.


तर ठाणे जिल्हा परिषद मार्फत मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच आदिवासी पट्ट्यात विविध स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाचा विकास झाल्याच्या धर्तीवर आज लागलेल्या निकालावरून दिसून आले आहे असे उद्गार ठाणे जिल्हा माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.तर शिंदे गटाचे थेट सरपंच पदाचे निवडून आलेले उमेदवारांचे सुभाष पवारांनी अभिनंदन केले आहे. तर मुरबाड तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला आहे तेथे भाजपाचे उमेदवार जगदीश हिंदुराव यांनी थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे.

Comments
Add Comment

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

विजयदुर्गमध्ये रोरो प्रवासी बोटीचे जल्लोषात स्वागत

विजयदुर्ग : कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानात राजकीय रॅलीनंतर बॉम्बस्फोट, १४ जण ठार तर ३५ जण जखमी

कराची: पाकिस्तानमध्ये दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोटाच्या घटना घडत आहेत. त्यानुसार काल रात्री पुन्हा एकदा