Wamanrao Pai : व्यापूनी राहिला अकळ...


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे.
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ।
अकळ व सकळ या दोन्ही शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. आपण म्हणतो ते हे सकळ नव्हे. सकळ म्हणजे कळणारा, कळण्यात येणारा हा त्याचा अर्थ आहे. शून्य म्हणजे आपल्याला जे दिसत नाही ते. आकळता येते त्यापलीकडचे म्हणजे मन, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते शून्य. स्थावर म्हणजे Material. जंगम म्हणजे living गोष्टी. हलते चालते ते जंगम. “व्यापूनी राहिला अकळ.” सर्व व्यापून राहिला म्हणजे उरला, तो अकळ आहे म्हणजे कळण्यात येणार नाही. “बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ.”



रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
देही असोनिया देव,वृथा फिरतो निदैव।
देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी
नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी।
दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित
तुका सांगे मूढजना, देव देही का पाहाना।



इथेसुद्धा एकेक दृष्टांत दिलेले आहेत. पण परफेक्ट कुठलाच नाही. “नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी.” “दुधी असता नवनीत,नेणे तयाचे मथित” हा दृष्टांत जरा जवळ जाणारा आहे. “तुका सांगे मूढजना, देव देही का पहाना.” देवाला पाहण्यासाठी कुठे शोधत जाता? चारधाम. घाम गाळतात, दाम खर्च करतात व शेवटी दमून जातात, आता आपल्या घरी जाऊया. कितीही फिरलात, तरी घरी आल्याशिवाय बरे वाटत नाही. घारापुरीला जा नाही, तर पाणीपुरी खायला जा शेवटी घर ते घर.



सांगायचा मुद्दा परमेश्वराबद्दल कितीही बोलले, तरी ते limited बोलता येते. अकळ व सकळ हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या ठिकाणी तो सकळ आहे. ईश्वररूपाने आपण त्याचा बोध घेऊ शकतो. किंबहुना होतो निरनिराळ्या प्रकारे. हा बोध कसा घ्यायचा, त्याला पाहायचे कसे? त्याला अनुभवायचे कसे हे सद्गुरू शिकवितात. म्हणून,
सद्गुरूवाचोनी
सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी।
आपणासारिखे करिती तत्काळ,
नाही काळवेळ तयालागी।
लोह परिसाची न साहे उपमा,
सद्गुरू महिमा अगाध।
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरोनी खऱ्या देवा।



सद्गुरूंना शरण जायचे की जायचे नाही, हे तू ठरव. म्हणून ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा