Wamanrao Pai : व्यापूनी राहिला अकळ...

  265


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे.
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ।
अकळ व सकळ या दोन्ही शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. आपण म्हणतो ते हे सकळ नव्हे. सकळ म्हणजे कळणारा, कळण्यात येणारा हा त्याचा अर्थ आहे. शून्य म्हणजे आपल्याला जे दिसत नाही ते. आकळता येते त्यापलीकडचे म्हणजे मन, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते शून्य. स्थावर म्हणजे Material. जंगम म्हणजे living गोष्टी. हलते चालते ते जंगम. “व्यापूनी राहिला अकळ.” सर्व व्यापून राहिला म्हणजे उरला, तो अकळ आहे म्हणजे कळण्यात येणार नाही. “बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ.”



रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
देही असोनिया देव,वृथा फिरतो निदैव।
देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी
नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी।
दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित
तुका सांगे मूढजना, देव देही का पाहाना।



इथेसुद्धा एकेक दृष्टांत दिलेले आहेत. पण परफेक्ट कुठलाच नाही. “नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी.” “दुधी असता नवनीत,नेणे तयाचे मथित” हा दृष्टांत जरा जवळ जाणारा आहे. “तुका सांगे मूढजना, देव देही का पहाना.” देवाला पाहण्यासाठी कुठे शोधत जाता? चारधाम. घाम गाळतात, दाम खर्च करतात व शेवटी दमून जातात, आता आपल्या घरी जाऊया. कितीही फिरलात, तरी घरी आल्याशिवाय बरे वाटत नाही. घारापुरीला जा नाही, तर पाणीपुरी खायला जा शेवटी घर ते घर.



सांगायचा मुद्दा परमेश्वराबद्दल कितीही बोलले, तरी ते limited बोलता येते. अकळ व सकळ हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या ठिकाणी तो सकळ आहे. ईश्वररूपाने आपण त्याचा बोध घेऊ शकतो. किंबहुना होतो निरनिराळ्या प्रकारे. हा बोध कसा घ्यायचा, त्याला पाहायचे कसे? त्याला अनुभवायचे कसे हे सद्गुरू शिकवितात. म्हणून,
सद्गुरूवाचोनी
सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी।
आपणासारिखे करिती तत्काळ,
नाही काळवेळ तयालागी।
लोह परिसाची न साहे उपमा,
सद्गुरू महिमा अगाध।
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरोनी खऱ्या देवा।



सद्गुरूंना शरण जायचे की जायचे नाही, हे तू ठरव. म्हणून ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’

Comments
Add Comment

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १

Vastu Tips: 'या' वस्तू कधीही मोफत घेऊ नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

मुंबई: आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण काही वस्तू दुसऱ्यांकडून मोफत घेतो किंवा भेट म्हणून स्वीकारतो. पण