श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद शमीने ५ विकेट घेत रचला इतिहास, भारतासाठी असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: वानखेडे स्टेडियममध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने भारताला यश मिळवून दिले. यानंतर सिराजने एका षटकात दोन विकेट घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. मोहम्मद शमीने तुफानी गोलंदाजी करताना पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले.

मोहम्मद शमीने पाच श्रीलंकेच्या फलंदाजांना बाद करत वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. शमी भारतासाठी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने १४ डावांत ४५ विकेट घेतल्या आहेत. त्याने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा रेकॉर्ड तोडला. जसप्रीत बुमराहने वर्ल्डकपच्या करिअरमध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज


४५- मोहम्मद शमी
४४- झहीर खान
४४-जवागल श्रीनाथ
३३ - जसप्रीत बुमराह
३१- अनिल कुंबळे

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ४ विकेट घेणारे गोलंदाज


मोहम्मद शमी - ७(१४ डाव)
मिचेल स्टार्क - ६(२४ डाव)

या ५ फलंदाजांना केले बाद


मोहम्मद शमीने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये कहर केला. आपल्या पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर असलंकाला बाद करत पहिली विकेट घेती. पुढच्याच बॉलवर दुष्मंथा हेमंथाला बाद करत दुसरी विकेट घेतली. ११व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर चमिराला बाद करत तिसरी विकेट घेतली. १३व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अँजेलो मॅथ्यूजला बाद करत चौथे यश मिळवले. १७व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रजिथाला बाद करता पाचवे यश मिळवले.
Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन