Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीMaratha Reservation : मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Maratha Reservation : मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विधानसभा आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप-शिवसेना वगळता सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आमदारांनी काही वेळापूर्वीच मंत्रालयाच्या गेटना टाळे ठोकून गेटवर आंदोलनाला बसले होते.

राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. मराठा आंदोलनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.

मात्र आजपर्यंत मराठा आरक्षणावर चकार शब्द न काढणा-या आमदारांच्या घरांपर्यंत आंदोलनाची धग पोहचली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या आमदारांनी राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. यातच कालपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार, ठाकरे गटाचे आमदार विधानसभेच्या आवारात आंदोलनाला बसले होते. आज त्यांनी मंत्रालयाला टाळे ठोकले.

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या आमदारांनी केली. यामध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -