World Cup 2023: कोहलीशी ताळमेळ, गोलंदाजांची पारख, सुपरहिट आहे रोहितचे नेतृत्व

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये धमाल करत आहे. सध्या संघ विजयरथावर स्वार आहे. भारतीय संघाने आपले सुरूवातीचे ६ सामने जिंकले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली आहे.


मात्र या सगळ्यामागे एका व्यक्तीचे खूप कौतुक केले पाहिजे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर ते गौतम गंभीरपर्यंत या सर्वांनी रोहितचे तोंडभरून कौतुक केले आहे. पाकिस्तानी दिग्गज आणि चाहतेही रोहितचे कौतुक करताना थकत नाहीत.



गंभीरसह अनेक दिग्गजांकडून रोहितचे कौतुक


कर्णधारपदाचा दबाव असतानाही रोहित जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याची कामगिरी पाहून असे वाटते की तो कर्णधारपदाच्या दबावाखाली नाहीये तर कर्णधारपद एन्जॉय करतोय. गोलंदाजीदरम्यानही रोहितची रणनिती काम करत आहे. इतकंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ एका युनिटच्या रूपात पहिल्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहे.


गौतम गंभीरने इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी रोहितला सेल्फलेस कर्णधार म्हटले होते. तो म्हणाला होता की, जर रोहितने आकड्यांबाबत विचार केला असता तर त्याने आतापर्यंत ४०-५० शतके ठोकली असती. मात्र तो आकड्यांच्या मागे धावत नाही तर आपल्या खेळीने खास संदेश देतो. एक लीडर आणि कर्णधार हेच करतो. कर्णधार खूप झाले आहेत मात्र रोहित एक लीडर आहे.


भारताचा पुढील सामना २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. आतापर्यंत भारताने विजयी षटकार मारला आहे. भारत हाच विजयरथ श्रीलंकेविरुद्ध कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या