Resignations for Maratha Aarkshan : मराठा आरक्षणासाठी पदाधिकार्‍यांसह सरपंचांच्या राजीनाम्यांची मालिका

राज्यात पहिल्यांदाच महिला सरपंचांनीही दिला राजीनामा


मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Rservation) मुद्दा आता चांगलाच तापला असून यावर अद्याप तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक (Maratha Andolak) प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे, तर एसटींची, गाड्यांची जाळपोळ असे प्रकारही घडत आहेत. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना (Political leaders) गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळेस ते पाणीही घेत नाही आहेत आणि उपचार करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. दोन तीन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे.


यानंतर मराठा आरक्षणासाठी आता राजीनाम्यांची (Resignations) मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे व्यवस्थेला एका प्रकारे धाक दाखवण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आता माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला सरपंच आहेत.


मनोज जरांगे यांनी गावागावात उपोषण करण्याचे आवाहन केल्यानंतर आजपासून रांझणी भिमानगर येथे साखळी उपोषणाला सुरूवात झाली. प्राची सुरेश जाधव व मेजर संजय गोटणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांनी ही उपोषणाची घोषणा केली. त्यासोबतच गावच्या सरपंच महिलेने पदाचा राजीनामा दिल्याने आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला आहे.



बुरुडगाव येथील नऊ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा


अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे. ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीतून लोकनियुक्त सरपंच व ९ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये सरपंच अर्चना कुलट, उपसरपंच महेश निमसे, सदस्य- सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डीले, अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुक्मिणी जाधव, रंजना कुलट यांचा समावेश आहे.



शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हदगावचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही, असं पत्र सोपवत आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर केजमधील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह