Train accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली, ९ जणांचा मृत्यू

विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात रविवारी रेल्वे अपघात झाला. या अपघातात कमीत कमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. मृत व्यक्तींना सरकारकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाता प्रकरणी शोक व्यक्त केला.


रेल्वेच्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात सामील रेल्वेची नावे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०५ विशाखापट्टणम -रायगडा पॅसेंजर स्पेशल होते. या अपघातामुळे अनेक रेल्वेंचे मार्ग बदलाावे लागले. ज्या मार्गावर हा अपघात झाला तो मार्ग हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे मार्गावरील घसरलेले डबे दूर करण्याचे काम सुर आहे.



कसा झाला हा अपघात?


रेल्वेच्या माहितीनुसार, विजयनगरम जिल्ह्यात कांतकपल्लेमध्ये विशाखापट्टण-रायगडा पॅसेंजर स्पेशल रेल्वेने संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्ट्णम-पलासा पॅसेंजर रेल्वेला मागून धडक दिली. यामुळे या रेल्वेचे चार डबे रूळावरून घसरले.


 


रेल्वे मंत्र्यांकडून मदतीची घोषणा


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले रेल्वे अपघातातील पिडीतांना सरकारने मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना २ लाख रूपये तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी