Train accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली, ९ जणांचा मृत्यू

विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात रविवारी रेल्वे अपघात झाला. या अपघातात कमीत कमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. मृत व्यक्तींना सरकारकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाता प्रकरणी शोक व्यक्त केला.


रेल्वेच्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात सामील रेल्वेची नावे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०५ विशाखापट्टणम -रायगडा पॅसेंजर स्पेशल होते. या अपघातामुळे अनेक रेल्वेंचे मार्ग बदलाावे लागले. ज्या मार्गावर हा अपघात झाला तो मार्ग हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे मार्गावरील घसरलेले डबे दूर करण्याचे काम सुर आहे.



कसा झाला हा अपघात?


रेल्वेच्या माहितीनुसार, विजयनगरम जिल्ह्यात कांतकपल्लेमध्ये विशाखापट्टण-रायगडा पॅसेंजर स्पेशल रेल्वेने संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्ट्णम-पलासा पॅसेंजर रेल्वेला मागून धडक दिली. यामुळे या रेल्वेचे चार डबे रूळावरून घसरले.


 


रेल्वे मंत्र्यांकडून मदतीची घोषणा


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले रेल्वे अपघातातील पिडीतांना सरकारने मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना २ लाख रूपये तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६