Manoj Jarange Patil : चर्चेसाठी सरकारला दोन दिवस देतो, त्यानंतर माझी बोलती बंद होईल...

  314

जरांगेंनी काळजी घेण्याचं फडणवीसांचं आवाहन 


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी पाणी घेणंही बंद केलं आहे. रोज डॉक्टर तपासणीकरता येतात, मात्र जरांगे उपचारही करु देत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. दरम्यान, त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचंय ते बोला, असं जरांगे म्हणाले आहेत.


आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे.


पुढे जरांगे म्हणाले की, गावागावात प्रवेशबंदी केल्यामुळे आम्हाला चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही. यासाठी दोन दिवस मी चर्चेकरता तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

नवविवाहित जोडप्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे दुर्दैवी अंत

कोल्हापूर : कोल्हापूर मधील आजरा तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या जोडप्याचा गॅस गिझरच्या

अरे बापरे! बुलढाण्यात नवीन आजार! केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना पडताहेत भेगा?

बुलढाणा : बुलढाणा हा जिल्हा काही दिवसांपूर्वी अजब आजारांमुळे चर्चेचा विषय बनला होता. काही दिवसांपूर्वी

Bachchu Kadu यांना बँकेच्या संचालकपदावरून का हटवले? जाणून घ्या सविस्तर

उपोषण संपवल्यानंतर बच्चू कडू यांना सहनिबंधकांकडून धक्का  अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू

शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा झाली बंद! ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष टांगणीला

पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांचा संताप  कोंढवा: आजपासून राज्यभरातील सर्व शाळांना

Pune Maval bridge collapses : हुल्लडबाजीचे की प्रशासनाच्या बेफिकीरीचे बळी?

कुंडमळाचा ३५ वर्ष जुना पूल इंद्रायणीत कोसळला पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ

कामाचा आदेश निघताच पाच दिवसात कुंडमळाचा जुना पूल कोसळला

पुणे : कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी साकव कोसळून भीषण दुर्घटना घडली. ३५ वर्षे जुना असलेला हा पूल