Maratha Andolan : सदावर्तेंनंतर मराठा आंदोलकांकडून ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या गाडीची तोडफोड

सर्वपक्षीय नेत्यांवर मराठा समाजाचा रोष


बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे अन्यथा गावागावात उपोषण करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. मराठा समाज पेटून उठला असून गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या संतापातून आंदोलक कधी आत्महत्या तर कधी तोडफोड अशी बेकायदेशीर पावले उचलत आहेत.


दोनच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. यानंतर आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी आमदार बदामराव पंडित (Badamrao Pandit) यांच्यादेखील गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे मराठ्यांनी केवळ सत्ताधारीच नव्हे तर मागील काळात आरक्षण न देऊ शकलेल्या विरोधकांनाही टार्गेट केले आहे.


बीड जिल्ह्यात असताना हा गाडी फोडण्याचा प्रकार घडला. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, मादळमोही येथे संतप्त मराठा तरुणांनी त्यांची गाडी फोडली. गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेमुळे मराठा समाज आणखी काय काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये