श्रीनगर: पाकिस्तानने(pakistan) जम्मू-काश्मीरच्या जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा नापाक कारवाई केली. गुरवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानी सैन्याकडून बीएसएफवर निशाणा साधताना जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमेजवळील गावात राहणाऱ्या लोकांना बंकरमध्ये रहावे लागले.
हा गोळीबार गुरूवारी रात्रीपासून सुरू आहे आणि सीमेवर गोळीबाराचा आवाज सरु होता. अर्णिया सेक्टरमधील गावातील नागरिकांनी सांगितले की, गोळीबार रात्रभर सुरू आहे. आमच्या गावापासून बॉर्डर दीड किमी अंतरावर आहे. असे २-३ वर्षानंतर होत आहे. संपूर्ण गावातील नागरिक बंकरमध्ये आहेत. कोणालाच माहीत नाही अखेर काय होणार आहे.
अर्णिया सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, गोळीबार काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदार गोळीबार केला जात आहे. असे साधारण ४-५ वर्षांनी झाले. प्रत्येकजण आपल्या घरात आहेत. आमच्या गावात लग्न सुर होते. तेव्हा सर्व लोक तेथे आले होते. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की ते जिथे आहेत तिथेच थांबावे. सगळेजण आपल्या घरात लपले आहेत.
पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानकडून अचानक गोळीबार का केला जात आहे याची माहिती मिळालेली नाही. या गोळीबारात जिवितहानी झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…