श्रीनगर: पाकिस्तानने(pakistan) जम्मू-काश्मीरच्या जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा नापाक कारवाई केली. गुरवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानी सैन्याकडून बीएसएफवर निशाणा साधताना जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमेजवळील गावात राहणाऱ्या लोकांना बंकरमध्ये रहावे लागले.
हा गोळीबार गुरूवारी रात्रीपासून सुरू आहे आणि सीमेवर गोळीबाराचा आवाज सरु होता. अर्णिया सेक्टरमधील गावातील नागरिकांनी सांगितले की, गोळीबार रात्रभर सुरू आहे. आमच्या गावापासून बॉर्डर दीड किमी अंतरावर आहे. असे २-३ वर्षानंतर होत आहे. संपूर्ण गावातील नागरिक बंकरमध्ये आहेत. कोणालाच माहीत नाही अखेर काय होणार आहे.
अर्णिया सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, गोळीबार काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदार गोळीबार केला जात आहे. असे साधारण ४-५ वर्षांनी झाले. प्रत्येकजण आपल्या घरात आहेत. आमच्या गावात लग्न सुर होते. तेव्हा सर्व लोक तेथे आले होते. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की ते जिथे आहेत तिथेच थांबावे. सगळेजण आपल्या घरात लपले आहेत.
पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानकडून अचानक गोळीबार का केला जात आहे याची माहिती मिळालेली नाही. या गोळीबारात जिवितहानी झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…