Beed Ambulance Accident : रुग्णाला इस्पितळात नेण्याआधीच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चालकासह चार जणांचा मृत्यू

  174

बीडमधील दुर्घटना


बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेचा (Ambulance) भीषण अपघात (Beed Accident News) झाला आहे. रुग्णाला इस्पितळात पोहोचवण्याआधीच काळाने घाला घातला. रात्री बाराच्या सुमारास दौलावडगावच्या दत्तमंदिराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकची (Truck) धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की यात चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


रुग्णवाहिका दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ पोहोचली असतानाच एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. व्यंकटेश कंपनीजवळ डाव्या बाजूने वळण घेत असतानाच ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


थेट समोरचा भाग ट्रकवर जाऊन धडकल्याने चालक लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.


रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात सांगवीपाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (वय ३५ वर्षे, रा.धामणगाव) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरपुडे (दोन्ही राहणार जाटदेवळा) असा चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, एका जखमीवर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक