Indian Economy : जगात भारताची पत काय?

युरोपला मागे टाकत चीनलाही भारत घाम फोडणार!


बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था


नवी दिल्ली : जगात भारताची पत काय आहे हे अर्थव्यवस्थेतील काहीही ओ का ठो न कळणारी उद्धव ठाकरेंसारखी माणसे जेव्हा बोलतात, तेव्हा हसायला येते. विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणे किंवा सोशल मीडिया बघून आपला समज बनवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपला मागे टाकत देशाची केलेली भरभराट पहाता (Indian Economy) चीनलाही घाम फुटला आहे.


कोरोना महामारीनंतर जागतिक पटलावर अनेक समीकरणं बदलली. रशिया-युक्रेन युद्ध गेल्या १९ महिन्यांपासून सुरु आहे. आता इस्त्राईल-हमास युद्धाने जगाला वेठीस धरले आहे. पण या काळात भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) तुफान वेगाने घौडदौड करत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला अजूनही सावरता आलेले नाही. उलट चीनची अवस्था अजून वाईट होण्याची भीती आहे. हा घटनाक्रम भारताच्या पथ्यावर पडत आहे.


S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने (IMF) जारी केलेल्या नवीन पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) अहवालात असे म्हटले आहे की, कोरोनानंतरच्या काळात भारताने सर्वच क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. २०२१ आणि २०२२ या वर्षात सलग दोन वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे आणि यामध्ये चालू आर्थिक वर्ष २०२३ मध्येही भारताची चांगल्या वाढीसह वेगाने घौडदौड पुढे सुरू आहे.


सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु २०३० पर्यंत जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि IMF पासून जागतिक बँकेपर्यंत सर्व जागतिक एजन्सींनी देशाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.


भारतावर विश्वास व्यक्त करताना, ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने आपल्या अहवालात म्हटले आहे की, येत्या सात वर्षांत देश चांगली कामगिरी करेल आणि २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.


२०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७,३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि जपानचा जीडीपी मागे राहील. ग्लोबल इंडियाच्या मते, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.२ टक्के ते ६.३ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात, मार्च २०२४ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.


ग्लोबलच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची सातत्याने वाढ होणे अपेक्षित आहे आणि या वाढीमध्ये सर्वात मोठे योगदान देशांतर्गत मागणी असेल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या जीडीपीच्या दृष्टीने पाहिले तर अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चीन आणि जपानचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांपेक्षा मोठा आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे