Bangladesh Train: बांगलादेशमध्ये दोन रेल्वेंची टक्कर, १५ जणांचा मृत्यू

ढाका: बांगलादेशच्या राजधानी ढाकाजवळ(dhaka) सोमवारी रेल्वेचा मोठा अपघात(railway accident) झाला. यात दोन रेल्वेंची टक्कर झाली. या अपघातात १५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार हा अपघात दुपारी किशोरगंजच्या भैरबमध्ये झाला. येथे एक मालगाडी प्रवासी रेल्वेला धडकली. दरम्यान, या अपघातात अधिक जिवितहानी होण्याची शक्यता आहे.


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात राजधानी ढाकापासून साधारण ८० किमी अंतरावर भैरब येथे झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांच्या माहितीनुसार यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते. कारण तेथे बचावकार्य सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लोक रेल्वेच्या खाली अडकले होते. अनेक जखमी लोक विखुरलेल्या डब्यांच्या खाली होते. अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.


रिपोर्टनुसार, सध्या बचाव कार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक लोकही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार