ढाका: बांगलादेशच्या राजधानी ढाकाजवळ(dhaka) सोमवारी रेल्वेचा मोठा अपघात(railway accident) झाला. यात दोन रेल्वेंची टक्कर झाली. या अपघातात १५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार हा अपघात दुपारी किशोरगंजच्या भैरबमध्ये झाला. येथे एक मालगाडी प्रवासी रेल्वेला धडकली. दरम्यान, या अपघातात अधिक जिवितहानी होण्याची शक्यता आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात राजधानी ढाकापासून साधारण ८० किमी अंतरावर भैरब येथे झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांच्या माहितीनुसार यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते. कारण तेथे बचावकार्य सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लोक रेल्वेच्या खाली अडकले होते. अनेक जखमी लोक विखुरलेल्या डब्यांच्या खाली होते. अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
रिपोर्टनुसार, सध्या बचाव कार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक लोकही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…